कोल्हापूर : आपल्या जेवणात इतर मसाल्याच्या घटकांबरोबरच आल्याचा वापर देखील सर्रास केला जात असतो. याच आल्याचा रस आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरत असतो. आले हे अनेक पोषकतत्वांनी युक्त असून रोज आल्याचा वापर केल्यास आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मुख्यतः हृदय रोगाशी संबंधित, पोट विकार, रक्ताभिसरण, चयापचय आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आल्याचा किंवा आल्याच्या रसाचा फायदा होतो. त्यामुळेच नेमक्या कोणकोणत्या समस्यांवर आले उपयोगी ठरू शकते, आल्याचा रस रोज पिल्याने नेमके काय काय फायदे होऊ शकतात, याबाबत कोल्हापुरातील आयुर्वेद तज्ञ डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी महत्त्वाची माहिती दिली.



