गावाकडे जमीन रिकामी पडलीये का? मग हे पीक लावाच, पाणी असो किंवा दुष्काळ वर्षभर घरात येईल बक्कळ पैसा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : बदलत्या शेती परिस्थितीत कमी खर्चात स्थिर आणि दीर्घकालीन उत्पन्न मिळवण्याचा पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड एक प्रभावी संधी ठरत आहे.
मुंबई : बदलत्या शेती परिस्थितीत कमी खर्चात स्थिर आणि दीर्घकालीन उत्पन्न मिळवण्याचा पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड एक प्रभावी संधी ठरत आहे. पारंपरिक पिकांमध्ये वाढता खर्च, अनिश्चित हवामान आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी नव्या प्रयोगांकडे वळत आहेत. अशा वेळी बांबूची शेती कमी गुंतवणुकीत सुरू करता येते आणि ओसाड, मोकळी किंवा शेताच्या सीमेवरील जमीनही उत्पन्न देणारी बनवता येते. त्यामुळे बांबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
advertisement
बांबूची शेती फायदेशीर
आज अनेक शेतकऱ्यांकडे अशी जमीन आहे जिथे नियमित पिके घेणे शक्य नसते. अशा जमिनी अनेकदा न वापरता तशाच पडून राहतात. मात्र, बांबू लागवडीमुळे या जमिनींचा योग्य वापर होऊ लागला आहे. राजस्थानसह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर, मोकळ्या जागेत आणि कमी सुपीक जमिनीवर बांबूची लागवड करून चांगले आर्थिक यश मिळवले आहे. एकदा लागवड झाल्यानंतर बांबू 3 ते 4 वर्षांत कापणीसाठी तयार होतो आणि पुढील अनेक वर्षे सातत्याने उत्पन्न देतो.
advertisement
बांबू लागवडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यासाठी लागणारा कमी खर्च. एका एकर क्षेत्रात बांबू लावण्यासाठी साधारणतः 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. या तुलनेत मिळणारे उत्पन्न अत्यंत आकर्षक आहे. अंदाजानुसार, योग्य व्यवस्थापन केल्यास 5 वर्षांत 30 ते 35 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे कमी भांडवल असलेल्या शेतकऱ्यांसाठी बांबू शेती हा सुरक्षित आणि नफ्याचा पर्याय ठरत आहे.
advertisement
बांबूला ‘हिरवे सोने’ असेही म्हटले जाते. कारण तो केवळ उत्पन्न देत नाही तर जमिनीची गुणवत्ता सुधारण्याचेही काम करतो. बांबूच्या झाडांमधून गळणारी पाने नैसर्गिक खतासारखी काम करतात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटक वाढतात, मातीची धारणशक्ती सुधारते आणि भविष्यात इतर पिकांसाठी जमीन अधिक सुपीक बनते. परिणामी रासायनिक खतांवरील खर्चही कमी होतो.
advertisement
लागवड कधी करावी?
लागवडीसाठी जुलै महिना सर्वाधिक योग्य मानला जातो. पावसाळ्यात लागवड केल्यास रोपे लवकर रुजतात आणि वाढ चांगली होते. मात्र, पुरेसा ओलावा उपलब्ध असल्यास बांबूची लागवड इतर हंगामातही करता येते. लागवडीनंतर बांबूला फारशी देखभाल लागत नाही, ही बाबही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
advertisement
बांबू ही अतिशय वेगाने वाढणारी वनस्पती आहे. त्याचे भूमिगत खोड म्हणजेच राईझोम जलद गतीने पसरते. काही जातींचा बांबू अवघ्या दोन महिन्यांत पूर्ण उंची गाठतो. पावसाळ्यात झाडांच्या भोवती माती टाकल्यास मुळे अधिक मजबूत होतात आणि उत्पादन वाढते.
बांबूची कापणी त्याच्या वापरावर अवलंबून असते. 3 ते 4 वर्षांचा बांबू टोपल्या, हलकी बांधकामे आणि शेती उपयोगासाठी वापरला जातो, तर 5 ते ६ वर्षांचा बांबू मजबूत बांधकामासाठी योग्य ठरतो. ऑक्टोबर ते डिसेंबर हा कापणीसाठी उत्तम काळ मानला जातो. उन्हाळ्यात कापणी टाळावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
फर्निचर, घरबांधणी, हस्तकला, टोपल्या, तसेच धार्मिक कार्यांसाठी बांबूची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बाजारपेठ उपलब्ध असल्याने विक्रीची अडचण येत नाही. मात्र, लागवडीसाठी योग्य जातीची निवड करणे महत्त्वाचे आहे. भारतात सुमारे 136 बांबूच्या जाती असल्या तरी त्यापैकी काही निवडक जातीच व्यावसायिक लागवडीसाठी उपयुक्त आहेत. रोपांमध्ये 3 ते 4 मीटर अंतर ठेवल्यास वाढ उत्तम होते. योग्य नियोजन केल्यास बांबू लागवड शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 8:53 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
गावाकडे जमीन रिकामी पडलीये का? मग हे पीक लावाच, पाणी असो किंवा दुष्काळ वर्षभर घरात येईल बक्कळ पैसा










