Donkey : गाढव पालन करा अन् 50 लाख मिळवा, केंद्र सरकारची नवीन योजना आहे तरी काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : क्रीम आणि साबण यांसारख्या सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तू बनवण्यात गाढवीच्या दुधाचे महत्त्व कोणापासूनही लपलेले नाही. गाढवीच्या दुधाचे औषधी मूल्य लक्षात घेता, आता अन्नपदार्थांमध्ये गाढवीचे दूध समाविष्ट करण्याची चर्चा आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेला (एनडीआरआय) एक पत्रही लिहिले आहे. अलिकडेच बाबा रामदेव यांनीही सार्वजनिकरित्या गाढवीचे दूध प्यायले आणि ते स्वादिष्ट असल्याचे म्हटले.
मुंबई : क्रीम आणि साबण यांसारख्या सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तू बनवण्यात गाढवीच्या दुधाचे महत्त्व कोणापासूनही लपलेले नाही. गाढवीच्या दुधाचे औषधी मूल्य लक्षात घेता, आता अन्नपदार्थांमध्ये गाढवीचे दूध समाविष्ट करण्याची चर्चा आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेला (एनडीआरआय) एक पत्रही लिहिले आहे. अलिकडेच बाबा रामदेव यांनीही सार्वजनिकरित्या गाढवीचे दूध प्यायले आणि ते स्वादिष्ट असल्याचे म्हटले. पण चिंताजनक बाब म्हणजे गाढवांची संख्या सतत कमी होत आहे. गाढवांच्या प्रगत जाती, मालधारी गाढवांची संख्या आणखी कमी झाली आहे.
आता बोटांवर मोजता येतील इतकेच उरले आहेत. हे लक्षात घेऊन, केंद्र सरकार गाढवांची संख्या वाढवणे, जाती सुधारणे आणि संगोपन यासाठी एक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत गाढवे पाळण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे. याशिवाय, बाजारपेठ आणि तांत्रिक सहाय्य देखील प्रदान केले जात आहे.
योजना काय आहे?
राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम) योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली. सुरुवातीला या योजनेअंतर्गत जे कोणी गाढवांचे पालन करेल त्यांना 25 ते 50 लाख रुपयांची रक्कम अनुदान म्हणून देण्यात आले आहे. विशेषतः गाढवांबद्दल बोलायचे झाले तर, या योजनेअंतर्गत गाढव प्रजनन केंद्रे, जाती सुधारणे आणि गाढव संगोपन यावर भर दिला जात आहे. यासाठी आता सरकार खर्चाच्या 50 टक्के अनुदान देत आहे.
advertisement
देशात सध्या गाढवांची संख्या किती?
एका सरकारी अहवालानुसार, जर आपण 2019 च्या पशुधनगणनेच्या आकडेवारीनुसार पाहिले तर देशात गाढवांची एकूण संख्या 1.23 लाख आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाढवांची संख्या सर्वाधिक आहे. या राज्यांमध्ये गाढवांची संख्या सुमारे एक लाख आहे. देशातील फक्त 28 राज्यांमध्ये गाढवे उरली आहेत. त्यातही, अशी अनेक राज्ये आहेत जिथे गाढवांची संख्या दोन ते दहा दरम्यान आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2025 12:30 PM IST







