TRENDING:

नोकरीत मन रमेना, तरुणानं थेट गाव गाठलं अन् सुरू केला 'हा' भन्नाट व्यवसाय, आता करतोय २ कोटींची कमाई

Last Updated:

Success Story : बदलत्या काळात नोकरी हीच यशाची एकमेव वाट राहिलेली नाही, हे आज अनेक तरुण दाखवून देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बदलत्या काळात नोकरी हीच यशाची एकमेव वाट राहिलेली नाही, हे आज अनेक तरुण दाखवून देत आहेत. शहरातील आरामदायी नोकरी सोडून शेती, पशुपालन आणि ग्रामीण उद्योगांकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढत आहे. शिक्षण, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची जाण यांचा योग्य वापर करून हे तरुण केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाहीत, तर इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत. अशाच एका उच्चशिक्षित तरुणाची ही प्रेरणादायी कहाणी आहे, ज्याने नोकरीचा मार्ग सोडून दुग्ध व्यवसायात उतरून तब्बल दोन कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेला व्यवसाय उभा केला आहे.
Success Story
Success Story
advertisement

नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्राधान्य

हरिओम नौटियाल असे या तरुणाचे नाव असून, ते उत्तराखंडमधील डेहराडूनचे रहिवासी आहेत. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर हरिओम एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होते. आर्थिक स्थैर्य असूनही नोकरीत त्यांचे मन रमले नाही. सततच्या ठराविक कामामुळे आणि मर्यादित स्वातंत्र्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना अनेकांनी त्यांना विरोध केला, काहींनी तर हा निर्णय धाडसी आणि चुकीचा असल्याचेही सांगितले. मात्र, हरिओम यांनी आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नोकरीला रामराम ठोकला आणि गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.

advertisement

दहा गायींपासून सुरू झालेला प्रवास

गावी परतल्यानंतर हरिओम यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केली. सुरुवातीला त्यांनी अवघ्या दहा गायींवर व्यवसाय सुरू केला. पहिल्या काही महिन्यांत अनेक अडचणी आल्या. दूध उत्पादन चांगले होत होते, मात्र विक्रीसाठी योग्य बाजारपेठ मिळत नव्हती. कधी दर कमी, कधी वाहतुकीचा प्रश्न तर कधी ग्राहकांचा अभाव अशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी हार मानली नाही. सातत्य, मेहनत आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर त्यांनी व्यवसाय टिकवून ठेवला.

advertisement

दूध संकलन केंद्राने दिली नवी दिशा

हळूहळू हरिओम यांना स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास आणि पाठिंबा मिळू लागला. अनेक लहान शेतकरी आणि पशुपालक त्यांच्यासोबत जोडले गेले. याच पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये हरिओम यांनी दूध संकलन केंद्राची स्थापना केली. या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला पूर्णपणे नवे वळण मिळाले. दूध थेट शेतकऱ्यांकडून संकलित करून प्रक्रिया आणि विक्री करण्याची साखळी उभी राहिली. त्यामुळे उत्पादन वाढले, खर्च कमी झाला आणि नफ्यात लक्षणीय वाढ झाली.

advertisement

गुणवत्तेवर भर, ग्राहकांचा विश्वास

हरिओम यांनी सुरुवातीपासूनच दुधाच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले. शुद्ध, ताजे आणि कोणतीही भेसळ नसलेले दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा आग्रह राहिला. ‘धान्य धेनू’ या नावाने त्यांनी आपल्या उपक्रमाची ओळख निर्माण केली. आज डेहराडून आणि ऋषिकेश परिसरात दररोज सुमारे २५० लिटर दूध विक्री केली जाते. अनेक ग्राहक गेल्या नऊ वर्षांपासून नियमितपणे त्यांच्याकडून दूध घेत आहेत, हे त्यांच्या विश्वासार्हतेचे मोठे उदाहरण आहे.

advertisement

दोन कोटींची उलाढाल आणि रोजगारनिर्मिती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

दूध विक्रीपुरतेच न थांबता हरिओम यांनी व्यवसायाचा विस्तार केला. मावा, आईस्क्रीम, रबडी, फालूदा तसेच घरगुती पद्धतीने बनवलेली लोणची अशी विविध उत्पादने त्यांनी बाजारात आणली. स्थानिक बाजारपेठा आणि व्यापारी मेळ्यांमधून या उत्पादनांना चांगली मागणी मिळू लागली. आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे या दुग्ध व्यवसायातून १५ गावांतील सुमारे ५०० लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे.

मराठी बातम्या/कृषी/
नोकरीत मन रमेना, तरुणानं थेट गाव गाठलं अन् सुरू केला 'हा' भन्नाट व्यवसाय, आता करतोय २ कोटींची कमाई
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल