TRENDING:

सरकारने डाव टाकला! जरांगेंचे सरकारवर आरोप, पुढची दिशा काय? थेट सांगितलं

Last Updated:

Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनात मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला आहे.जरांगे आंदोलनस्थळी पोहोचले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? याकडे राज्याचे लक्षं लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला आहे.जरांगे आंदोलनस्थळी पोहोचले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? याकडे राज्याचे लक्षं लागले आहे.
jarange patil
jarange patil
advertisement

जरांगेंनी मोठेपणा दाखवला

बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येणं गरजेचे आहे. आंदोलनात प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे तो मी दाखवला. विरोधकांनी पाठिंबा दिला आहे.जरांगे यांनी आंदोलनाला येत मोठेपणा दाखवला. वरचा देव पावला आता खालचा देव पावतो का? हे पाहावं लागणार आहे. मुंबईला जाऊन यश घेऊनच येईल. असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

सरकारने डाव टाकला, जरांगेंचा आरोप

जरांगे म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून येथे आलो आहे. आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक आहे. सरकारने डाव टाकला आहे. सरकारच्या षडयंत्राला प्रत्युत्तर द्यावं लागणार हे कळालं आणि मी नागपूरला निघालो. पुढील दिशा काय असेल? काय केलं पाहिजे हे ठरवायला लागेल.शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतोय. माझा आंदोनलाना पाठिंबा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने कमी मदत दिली. सरकारने शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई द्यावी. सरकारने मदत करण्याची हीच वेळ आहे. सगळे शेतकरी एकत्र यायला हवं, शेतकऱ्यांच्या मागण्यांतील मला ज्ञान नाही.

advertisement

चार महामार्ग ठप्प

बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर परिसरातील चार प्रमुख महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेतकरी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. वाढत्या तणावामुळे हायकोर्टात या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल झाली. कोर्टाने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामं करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी नागपूर पोलिसांकडे स्वतःहून अटक होण्यासाठी पायी मोर्चा काढला. हजारो आंदोलक त्यांच्यासोबत निघाले आणि या दरम्यान नागपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

advertisement

मुंबईत बैठक तोडगा निघणार का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील तरुणाईला मानसिक आजाराचा विळखा, अहवालानं वाढवलं टेन्शन, काय काळजी घ्याल
सर्व पहा

आज मुख्यमंत्री फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने जर सकारात्मक निर्णय घेतला तर हे आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/कृषी/
सरकारने डाव टाकला! जरांगेंचे सरकारवर आरोप, पुढची दिशा काय? थेट सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल