TRENDING:

Agriculture News: होतं नव्हतं सगळं गेलं, आता बहिणीचं लग्न कसं करू? शेतकरी भावाच्या डोळ्यात आलं पाणी!

Last Updated:

मोसंबीचं आगार म्हणून जालना जिल्ह्याची ओळख. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने येथील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
जालना : मोसंबीचं आगार म्हणून जालना जिल्ह्याची ओळख. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने येथील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. मोसंबी बागेवर असलेली 20 टन मोसंबी आता दोन टन देखील शिल्लक राहिली नाही. त्यामुळे बहिणीचे लग्न आणि सावकाराचं कर्ज या फेऱ्यात शेतकरी अडकलाय. जालन्यातील तळेगाव येथील शेतकरी श्रीकिशन शिवतारे यांची व्यथा देखील अशीच आहे.
advertisement

जालन्यातील तळेगाव येथील मोसंबी उत्पादकांना मोसंबीच्या भाववाढीची अपेक्षा होती. बाजारामध्ये मोसंबीला 10 ते 12 रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने भाव 20 ते 22 हजार रुपये प्रति टनापर्यंत जातील आणि आपल्याला चांगलं उत्पन्न हाती येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोसंबी बागेची तोड टाळली.

Agriculture News : महाराष्ट्रातली हवा बदलली, शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

advertisement

परंतु निसर्गाचे कधीही न पाहिलेले रौद्ररूप सप्टेंबर महिन्यात पाहायला मिळालं. बाराशे ते तेराशे मोसंबी झाडावर असलेली 25 ते 30 टन मोसंबी अति पाण्याने जमिनीवर पडलीये. दोन टन मोसंबी देखील झाडावर शिल्लक नाही. घरी गेलं तर विवाहयोग्य बहीण दिसते आणि शेतात आलं तर झालेलं नुकसान. सरकारने ठोस भरपाई दिली नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे श्रीकिशन शिवतारे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी, पण चालवतात ‘5 स्टार रिक्षा’, Video पाहाल तर आवाक् व्हाल
सर्व पहा

याच गावातील विजय शिवतारे यांची देखील 800 झाडांची मोसंबी बाग आहे. सावकारी कर्ज काढून त्यांनी या बागेचे पोषण केलं. या बागेतून सात ते आठ लाख उत्पन्न होईल या उत्पन्नातून कर्ज फेडून दसरा दिवाळी सारखे सण साजरे करता येतील अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती. परंतु या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरलंय. शासनाने हेक्टरी दोन ते अडीच लाख रुपये एवढी मदत मोसंबी फळबाग धारकांना केली तरच आम्ही तग धरू शकतो नाहीतर गळ्याला फास लावल्याशिवाय पर्याय नसल्याचे विजय शिवतारे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News: होतं नव्हतं सगळं गेलं, आता बहिणीचं लग्न कसं करू? शेतकरी भावाच्या डोळ्यात आलं पाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल