TRENDING:

अंधार दाटणार! समुद्राच्या लाटा उसळणार, 24 तासांत पावसाचं मोठं संकट, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर

Last Updated:

Maharashtra Weather Update : राज्याच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. आज 26 जुलै आणि 27 जुलै रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्याच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. आज 26 जुलै आणि 27 जुलै रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणातील इतर जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
maharashtra weather news
maharashtra weather news
advertisement

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत आज काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दुसऱ्या दिवशीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, समुद्रात लाटांची उंची सुमारे 4.67 मीटरपर्यंत जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर शहरात जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून, यामुळे वाहतुकीवर आणि निचऱ्याच्या प्रणालीवर परिणाम होऊ शकतो.

advertisement

2019 नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट!

ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर

नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने येथेही ऑरेंज अलर्ट दिला आहे. पावसामुळे दोन्ही ठिकाणी काही सखल भागांत पाणी साचू शकते. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळावा, असे प्रशासनाने सांगितले आहे. या स्थितीचा शाळा आणि कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

advertisement

पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट, शाळांना सुट्टी

भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता, तर आज 26 जुलै रोजी अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना आजच्या दिवशी सुट्टी घोषित केली आहे. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची स्थिती असून, पुढील 24 तासांमध्ये काही भागांमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

advertisement

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्येही अलर्ट कायम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून ऑरेंज अलर्ट कायम आहे. आजही या भागांमध्ये जोरदार पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन होण्याची तसेच नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीच्या जवळील गावांमध्ये सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
अंधार दाटणार! समुद्राच्या लाटा उसळणार, 24 तासांत पावसाचं मोठं संकट, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल