TRENDING:

सरकारकडून नमो शेतकरीचे पैसे जमा, तुम्हाला मिळाले नाही का? वाचा त्यामागची 5 कारणे

Last Updated:

Agriculture News : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (9 सप्टेंबर) रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रु जमा केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (9 सप्टेंबर) रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रु जमा केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ठराविक रक्कम थेट जमा केली जाते. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत. मग आता या मागची कारणे काय आहेत? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Agriculture News
Agriculture News
advertisement

1) आधार व बँक खात्याची लिंकिंग न होणे

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व बँक खाते लिंक असणे बंधनकारक आहे. अनेक शेतकऱ्यांनी आधार व बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे जोडलेली नसल्याने व्यवहार अपूर्ण राहतो. यामुळे पैसे खात्यात जमा होत नाहीत.

2) चुकीची नोंदणी माहिती

शेतकऱ्यांची माहिती भरताना नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, सातबारा उतारा यामध्ये चूक झाल्यास रक्कम रोखली जाते. चुकीची नोंदणी ही सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे.

advertisement

3) पात्रता निकष पूर्ण न होणे

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा जमीनधारक आणि कृषी व्यवसाय करणारा असणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यावर नसेल, जमीन भाड्याने घेतलेली असेल किंवा तो सरकारी कर्मचारी/निवृत्त असेल, तर तो या योजनेत पात्र राहत नाही.

4) बँक खात्याशी संबंधित समस्या

काहीवेळा शेतकऱ्यांचे बँक खाते निष्क्रिय (Inactive) झालेले असते किंवा त्यात KYC पूर्ण नसते. अशा वेळी शासनाकडून पाठवलेली रक्कम परत जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःची बँक माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.

advertisement

5) पडताळणी प्रक्रिया अपूर्ण राहणे

शेतकऱ्यांनी अर्ज केला असला तरी त्याची तालुका स्तरावर पडताळणी पूर्ण झालेली नसते. कागदपत्रे सादर करताना विसंगती असल्यास अर्ज होल्डवर ठेवला जातो. यामुळे हप्ता खात्यात जमा होण्यास उशीर होतो.

उपाय काय?

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपली माहिती अद्ययावत आहे की नाही हे तपासावे.

बँक खात्याची स्थिती सक्रिय आहे का, KYC पूर्ण आहे का, हे खात्री करावी.

advertisement

सातबारा उतारा व आधार कार्डातील नाव एकसारखे असल्याची पडताळणी करावी.

काही शंका असल्यास कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा बँकेत चौकशी करावी.

मराठी बातम्या/कृषी/
सरकारकडून नमो शेतकरीचे पैसे जमा, तुम्हाला मिळाले नाही का? वाचा त्यामागची 5 कारणे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल