का धोकादायक आहे हा त्रिग्रही योग?
मंगळ हा अग्नी तत्त्वाचा आणि रागाचा कारक आहे, तर राहू हा भ्रम आणि विद्रोहाचा कारक आहे. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा 'अंगारक योग' सदृश स्थिती निर्माण होते. त्यात बुधाची भर पडल्याने संवादात कटुता आणि चुकीच्या निर्णयांची शक्यता वाढते. यामुळे समाजात तणाव, अपघात आणि नैसर्गिक आपत्तींची शक्यता बळावते.
advertisement
या 3 राशींनी 11 एप्रिलपर्यंत राहावे अत्यंत सावध
कर्क - मानसिक तणाव आणि अपघात
कर्क राशीच्या आठव्या भावात ही युती होत आहे. हे स्थान संकट आणि अपघातांचे मानले जाते. या काळात वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. विनाकारण मनात भीती आणि अस्वस्थता राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः रक्ताशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात.
कन्या - शत्रू आणि गुप्त समस्या
तुमच्या सहाव्या भावात हे तीन ग्रह एकत्र येत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होतील आणि तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करतील. या काळात कोणाकडूनही कर्ज घेऊ नका किंवा कोणाला जामीन राहू नका. कोर्ट-कचेरीच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.
धनु - संवादात कडवटपणा आणि वाद
धनु राशीच्या तिसऱ्या भावात ही युती होत असून, ती तुमच्या पराक्रमावर आणि वाणीवर परिणाम करेल. भावंडांशी किंवा जवळच्या मित्रांशी गंभीर वाद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने महत्त्वाच्या चर्चेत शांत राहणेच हिताचे ठरेल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची चोरी होण्याची भीती आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
