Team India : कधी संधी नव्हती, तर कधी पैसाही नव्हता... टीम इंडियाच्या 15 चॅम्पियन्सच्या 15 संघर्षकथा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाने लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला आहे. टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या 15 खेळाडूंचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षाचा होता.
पंजाबच्या लहान मैदानांवरून क्रिकेटचा प्रवास सुरू केलेल्या अभिषेकला सतत “टॅलेंट आहे पण सातत्य नाही” अशी टीका ऐकावी लागली. आयपीएलमध्ये संधी मिळाली तरी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. अनेकदा संघाबाहेर राहूनही त्याने मेहनत थांबवली नाही. 2026 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासाठी मोठी खेळी करत त्याने टीकाकारांना उत्तर दिले.
advertisement
केरळमधून भारतीय संघात पोहोचणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये संजूचा समावेश झाला, पण त्याला सातत्याने संधी मिळाली नाही. अनेक वर्षे “टॅलेंटेड पण अनलकी” असा टॅग त्याच्यासोबत राहिला. वर्ल्ड कपपूर्वी खराब फॉर्ममुळे तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरही झाला. पण संधी मिळताच फायनलमध्ये मॅच जिंकणारी खेळी करत संजू भारताचा हिरो ठरला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









