advertisement

T20 World Cup : ना बुमराह, ना सूर्या... सलग 2 वर्ल्ड कप जिंकवणारा टीम इंडियाचा खरा हिरा!

Last Updated:
लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. 2026 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला आहे.
1/7
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून 255 रनचा मोठा स्कोअर उभारला. एवढ्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा फक्त 159 रनवर ऑलआऊट झाला.
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून 255 रनचा मोठा स्कोअर उभारला. एवढ्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा फक्त 159 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
2/7
भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, अक्षर पटेलने 3 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. बॅटिंगमध्ये भारताकडून संजू, अभिषेक आणि इशानने धमाका केला.
भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, अक्षर पटेलने 3 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. बॅटिंगमध्ये भारताकडून संजू, अभिषेक आणि इशानने धमाका केला.
advertisement
3/7
संजूने 46 बॉलमध्ये 89, अभिषेकने 21 बॉलमध्ये 52 आणि इशान किशनने 25 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली. तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये नाबाद 26 रन केले. या धमाकेदार बॅटिंगमुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 255 रनचा डोंगर उभारला.
संजूने 46 बॉलमध्ये 89, अभिषेकने 21 बॉलमध्ये 52 आणि इशान किशनने 25 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली. तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये नाबाद 26 रन केले. या धमाकेदार बॅटिंगमुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 255 रनचा डोंगर उभारला.
advertisement
4/7
लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरली आहे, तसंच घरच्या मैदानात वर्ल्ड कप जिंकण्याचा आणि एकूण 3 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.
लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरली आहे, तसंच घरच्या मैदानात वर्ल्ड कप जिंकण्याचा आणि एकूण 3 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.
advertisement
5/7
2007 साली टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात, 2024 साली रोहितच्या नेतृत्वात आणि आता 2026 साली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. रोहित आणि सूर्या तसंच भारताला लागोपाठ 2 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात एका खेळाडूचा महत्त्वाचा वाटा आहे.
2007 साली टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात, 2024 साली रोहितच्या नेतृत्वात आणि आता 2026 साली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. रोहित आणि सूर्या तसंच भारताला लागोपाठ 2 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात एका खेळाडूचा महत्त्वाचा वाटा आहे.
advertisement
6/7
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 27 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याआधी सेमी फायनलमध्येही अक्षर पटेलने दोन उत्कृष्ट कॅच घेतले होते आणि एक विकेटही घेतली होती.
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 27 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याआधी सेमी फायनलमध्येही अक्षर पटेलने दोन उत्कृष्ट कॅच घेतले होते आणि एक विकेटही घेतली होती.
advertisement
7/7
याआधी 2024 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही अक्षरने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अक्षरने 2024 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये 31 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली, याशिवाय त्याने एक विकेटही घेतली होती.
याआधी 2024 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही अक्षरने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अक्षरने 2024 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये 31 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली, याशिवाय त्याने एक विकेटही घेतली होती.
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement