या कार एवढ्या स्वस्त कशा मिळतात?
सरकारी लिलावात कार स्वस्त मिळतात कारण याचा हेतू नफा कमावणे नसतो. तर वाहन लवकर विकणे हा असतो. अनेकदा बँका लोन न फेडल्यावर गाड्या जप्त करतात. नंतर त्या लिलावात विकतात. या व्यतिरिक्त सरकारी विभागही आपल्या जुन्या गाड्या बदलण्यासाठी त्या विकतात. या सर्व कारणांमुळे कारच्या किमंती बाजारापेक्षा खुप कमी ठेवल्या जातात.
advertisement
'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त सनरुफ कार! किंमत फक्त 6.99 लाख रुपयांपासून सुरू
हा लिलाव कुठे होतो?
भारतात अनेक सरकारी वेबसाइट आणि प्लॅटफॉर्म आहेत. जिथे अशा प्रकारचा लिलाव होतो. जसं की, e-auction पोर्टल, बँकेची वेबसाइट्स आणि MSTC (Metal Scrap Trade Corporation) सारख्या सरकारी साइट्स. या वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही सहज उपलब्ध कारची लिस्ट पाहू शकता. या कारसह त्याची माहिती, कंडीशन आणि बेस प्राइजही दिली जाते. ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत मिळते.
खरेदीची प्रक्रिया काय आहे?
सरकारी लिलावामुळे कार खरेदी करणं थोडं वेगळं होतं. सर्वात आधी तुम्हाला संबंधित वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं. यानंतर तुम्हाला एक लहानशी सिक्योरिटी रक्कम जमा करावी लागते. जिला EMD म्हणतात. नंतर तुम्ही तुमच्या पसंतीच्या कारची बोली लावू शकता. जी व्यक्ती सर्वात जास्त बोली लावते. तिला ती कार मिळते. पेमेंट केल्यानंतर तुम्ही कार तुमच्या नावावर ट्रान्सफर करू शकता.
उन्हाळ्यात अशी घ्या कार इंजिनसह टायर्सची काळजी! कधीच येणार नाही प्रॉब्लम, होईल मोठा फायदा
या गोष्टींकडे अवश्य लक्ष ठेवा
स्वस्त कार खरेदी करणं चांगली संधी आहे. मात्र काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. लिलावात मिळणाऱ्या कार जास्तीत जास्त “as is where is” कंडीशनमध्ये असतात. म्हणजेच तुम्हाला ज्या स्थितीत आहेत तशा खरेदी करावा लागतात. यामुळेच कारची पूर्ण माहिती अवश्य वाचा आणि शक्य असेल तर आधी पाहून घ्या. सोबतच पेपर आणि रजिस्ट्रेशन तपासणेही गरजेचे आहे. जेणेकरुन नंतर कोणतीही अडचण येणार नाही.
