वाडा तालुक्यातील गारगाव गावातील 20 वर्षीय तरूणीचा विवाह सिन्नर तालुक्यातील वडगांव पिंगळा गावातील 31 वर्षीय व्यक्तीसोबत मे 2024 मध्ये लग्न झालं होतं. 20 वर्षीय तरूणीचं 31 वर्षीय सुनील गायधनीसोबत 9 मे 2024 सोबत लग्न केलं होतं. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये हळू हळू वादाचे खटके उडू लागले. वादामध्ये तरूणीचा नवरा आणि सासू तिला टोमणे मारणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आणि शेजारील लोकांसोबत बोलून न देणे असा प्रकार करत होते. त्या तरूणीच्या सासरकडील लोकं इतक्यावरच थांबले नाहीत, तिला मारहाण सुद्धा करायचे.
advertisement
या वादामध्ये, सुनील गायधनीसोबत त्याची आई सुमन गायधनी, रघुनाथ दुधवडेसह आणखी एक आरोपीचा समावेश आहे. असे चौघेजण त्या 20 वर्षीय तरूणीचा छळ करायचे. जेव्हा ती तरूणी लग्नाच्या काही महिन्यांनंतर गर्भवती राहिली, तेव्हा तिचा नवरा तिला पट्ट्याने बऱ्याचदा मारहाण करायचा. शिवाय तिला घालून पाडून सुद्धा बोलायचा. 'तू आमच्या घरी राहू नकोस, तुझ्याशी लग्न करण्यासाठी रघुनाथ दुधवडेसोबत आणखी एका व्यक्तीला आम्ही 3 लाख रुपये दिले होते. ते आम्हाला पैसे परत दे आणि इथून निघून जा,' असं त्या तरूणीला तिच्या सासरकडचे लोकं म्हणायचे. या अवस्थेत घाबरलेल्या महिलेने वाडा पोलिस ठाणे गाठून सासरकडच्या नागरिकांविरोधात गुन्हा नोंदवला होता.
दरम्यान, पीडित महिलेने 20 जून 2025 रोजी मुलाला जन्म दिला. त्यानंतर 6 जानेवारी 2026 रोजी तिला नवरा, सासू आणि नणंद तिला वडगावला घेऊन जाण्यासाठी आले. मात्र, सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने सासरी जाण्यास नकार दिला. त्यावेळी तिच्या सासरकडच्यांनी तिला 'तू आली नाहीस तरी चालेल, आम्हाला आमचा मुलगा दे,' असे सांगितले. त्या पीडित महिलेने सासू आणि नवऱ्याच्या धमकीला घाबरून विवाहितेने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या कार्यकर्त्यांनी त्या पीडितेला पोलिस ठाण्यात नेऊन पती, सासू आणि इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस. एस. मेहेर करत आहेत.
