भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरातून प्रतिक्रिया देत आहे. मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अदिती द्रविड हिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
( कोण होती आलिया भट्टने साकारलेली रिअल 'राझी'? पाकिस्तानात राहून करत होती भारतासाठी हेरगिरी )
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अदिती द्रविड हिने पोस्टमध्ये लिहिलंय, "आणि आता मात्र ज्यांना पोटात दुखेल, त्यांनी थेट माझा देश सोडून जावं. घरातला आतंक आधी संपवायला हवा. मग बाहेरचा. जय हिंद", ऑपरेशन सिंदूरनंतर अदितीने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अदितीचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत चर्चा सुरू झाल्यात.
advertisement
अदिती द्रविड ही नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिची ही पोस्ट 'ऑपरेशन सिंदूर'ला पाठिंबा देणारी आहे. पाकिस्तानवर हल्ला कधी होणार? होणार की नाही, असे प्रश्न गेल्या 15 दिवसांत विचारून भारतीय सैन्यावर आणि सरकारवर ज्यांनी ज्यांनी अविश्वास दाखवला, त्यांच्या आता पोटात दुखत असेल तर त्यांनी देश सोडून जायला हवे, असे थेटपणे सांगत 'घरातला आतंक' आधी संपवायला हवा आणि नंतर बाहेरचा, अशी टिप्पणी आदितीने केली आहे. अदितीची पोस्ट व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरली आहे.
अदिती द्रविड हिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, तिने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अदिती उत्तर डान्सर आहे. तसंच ती उत्तर लिखाण देखील करते.
