अरहान खानच्या पालकांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर तो अनेक चढ-उतारांमधून गेला. यावर बोलताना सलमान खानने अरहानला मार्गदर्शन करत सांगितले, "तू तुझ्या पालकांच्या घटस्फोटानंतर खूप काही अनुभवलं आहेस. पण याचा अर्थ असा नाही की तू तिथेच थांबशील. एक दिवस, तुझे स्वतःचे कुटुंब आणि तुझं स्वतःचं जग असेल, त्यासाठी तुला आतापासून काम करावं लागेल."
advertisement
सलमान खानने अरहानला कुटुंबाची एकसंधता टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, "कुटुंबासाठी नेहमी वेळ काढा. जेवणाच्या वेळी कुटुंबासोबत एकत्र बसण्याची परंपरा असली पाहिजे. कोणीतरी कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असतो आणि त्याचा आदर करणे गरजेचे आहे."
अभिनेत्याने सासूलाच बनवलं बायको, लग्नानंतर झालं जगणं मुश्किल, आता असं जगतायत जीवन
सलमान खानच्या मते, नात्यात गोंधळ असू शकतो, परंतु जर तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी चुकीच्या आहेत, तर त्या स्वीकारण्याची आणि पुढे जाण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. तो पुढे म्हणाला, "कोणीतरी तुम्हाला फसवलं, तुमच्या विश्वासाला तडा दिला, तर त्या गोष्टीकडे जास्त वेळ देऊ नका. ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात पुढे जा."
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे प्रेमप्रकरण एका कॉफी जाहिरातीच्या सेटवर सुरू झाले होते. १९९८ मध्ये दोघांनी लग्न केले, आणि २००२ मध्ये अरहानचा जन्म झाला. मात्र, २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, परंतु तरीही त्यांनी मुलाच्या भविष्यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आजही, ते सह-पालकत्व निभावत आहेत आणि अरहानची पूर्ण जबाबदारी घेत आहेत. सलमान खानच्या या पॉडकास्टमधील संवादातून हे स्पष्ट होते की कुटुंब, नातेसंबंध आणि जीवनातील संघर्ष यांना सामोरे जाणे महत्त्वाचे आहे.
