TRENDING:

Salman Khan : अरबाज-मलायकाच्या घटस्फोटावर स्पष्टच बोलला सलमान खान, म्हणतो "कोणीतरी तुम्हाला फसवलं..."

Last Updated:

Salman Khan : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे प्रेमप्रकरण एका कॉफी जाहिरातीच्या सेटवर सुरू झाले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्याचा पुतण्या अरहान खान सोबत अनेक विषयांवर स्पष्टपणे चर्चा केली. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या मुलाने 'डंब बिर्याणी' नावाचा पॉडकास्ट सुरू केला आहे, आणि त्याचा पहिला भाग स्वतः सलमान खानच्या उपस्थितीत प्रदर्शित झाला. या शोमध्ये सलमानने अरहान आणि त्याच्या मित्रांना नातेसंबंध, कुटुंब आणि जीवनातील महत्त्वाच्या धड्यांबद्दल सल्ला दिला.
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे प्रेमप्रकरण एका कॉफी जाहिरातीच्या सेटवर सुरू झाले होते.
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे प्रेमप्रकरण एका कॉफी जाहिरातीच्या सेटवर सुरू झाले होते.
advertisement

अरहान खानच्या पालकांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर तो अनेक चढ-उतारांमधून गेला. यावर बोलताना सलमान खानने अरहानला मार्गदर्शन करत सांगितले, "तू तुझ्या पालकांच्या घटस्फोटानंतर खूप काही अनुभवलं आहेस. पण याचा अर्थ असा नाही की तू तिथेच थांबशील. एक दिवस, तुझे स्वतःचे कुटुंब आणि तुझं स्वतःचं जग असेल, त्यासाठी तुला आतापासून काम करावं लागेल."

advertisement

सलमान खानने अरहानला कुटुंबाची एकसंधता टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, "कुटुंबासाठी नेहमी वेळ काढा. जेवणाच्या वेळी कुटुंबासोबत एकत्र बसण्याची परंपरा असली पाहिजे. कोणीतरी कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असतो आणि त्याचा आदर करणे गरजेचे आहे."

अभिनेत्याने सासूलाच बनवलं बायको, लग्नानंतर झालं जगणं मुश्किल, आता असं जगतायत जीवन

सलमान खानच्या मते, नात्यात गोंधळ असू शकतो, परंतु जर तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी चुकीच्या आहेत, तर त्या स्वीकारण्याची आणि पुढे जाण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. तो पुढे म्हणाला, "कोणीतरी तुम्हाला फसवलं, तुमच्या विश्वासाला तडा दिला, तर त्या गोष्टीकडे जास्त वेळ देऊ नका. ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात पुढे जा."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे प्रेमप्रकरण एका कॉफी जाहिरातीच्या सेटवर सुरू झाले होते. १९९८ मध्ये दोघांनी लग्न केले, आणि २००२ मध्ये अरहानचा जन्म झाला. मात्र, २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, परंतु तरीही त्यांनी मुलाच्या भविष्यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आजही, ते सह-पालकत्व निभावत आहेत आणि अरहानची पूर्ण जबाबदारी घेत आहेत. सलमान खानच्या या पॉडकास्टमधील संवादातून हे स्पष्ट होते की कुटुंब, नातेसंबंध आणि जीवनातील संघर्ष यांना सामोरे जाणे महत्त्वाचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan : अरबाज-मलायकाच्या घटस्फोटावर स्पष्टच बोलला सलमान खान, म्हणतो "कोणीतरी तुम्हाला फसवलं..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल