नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे नाव उमेश वाघ असून तो एक सुरक्षारक्षक होता. मंगळवारी साधारण संध्याकाळची वेळ होती तेव्हा उमेश हा कोपर परिसरातील एका भागात नळावर हातपाय धूत होता. तेव्हाच तिथं असलेली एक महिला उमेशला त्या नळावर हातपाय का धूत होतास आणि पाणी का वाया घालवतोस म्हणून त्याला ओरडली. मग त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.
advertisement
महिलेचा पती तिथं येताच...
महिला आणि उमेश यांच्यात वाद झाल्यानंतर त्यामहिलेचा पती अक्षय जाधव तिथं आला आणि दोघांमध्येही वाद झाला. त्यानंतर उमेश रात्री रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी गेला जो तिथं सुरक्षारक्षकाचे काम करतो. साधारण 11 वाजता अक्षय हा उमेश जवळ पोहचला आणि परत एकदा वाद घालण्यास सुरुवात केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे अक्षयने रागाच्या भरात लोखंडी सळई घेतली आणि उमेशच्या डोक्यात मारली. सळईचा वार इतका जोरदार होता की उमेशचा त्यात मृत्यू झाला.
