डायबिटीस येणार नियंत्रणात
आवळ्याचे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केवळ इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवत नाहीत तर स्थूलपणा कमी करायला मदत करतात जे अनेकदा टाईप 2 मधुमेहाचं कारण ठरतं. याशिवाय आवळ्यामध्ये असलेलं क्रोमियम हे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 30 दिवस आवळ्याचा दररोज हे प्यायल्याने तुमच्या आरोग्यामध्येही सुधारणा दिसून येईल.
advertisement
वजन कमी होण्यास मिळणार मदत
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आवळ्याचा रस तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. सलग 30 दिवस रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने फक्त वजन कमी होण्यास मदत होणार नाही तर एकूणच आरोग्यात सुधारणा दिसून येईल. आवळ्यात असलेल्या फायबर्समुळे पचन सुधारतं. याशिवाय पोट बराच काळ भरलेलं राहतं, ज्यामुळे कमी भूक लागते. याव्यतिरिक्त, आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराचे मुक्त रॅडिकल्सच्या हानीपासून संरक्षण करतात आणि त्वचेला निरोगी ठेवतात.
बॅड कोलेस्टेरॉल होणार कमी
सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. आवळ्याचा रस नियमितपणे प्यायल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. इतकेच नाही तर आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स देखील हृदयविकाराचा धोका कमी करतात.
Benefits of Radish: हार्ट ॲटॅक, डायबिटीस सारख्या आजारांना दूर ठेवेल मुळा; रोजच्या आहारात करा समावेश
रोगप्रतिकार शक्ती वाढणार
दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आवळा हा जीवनसत्व सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे शरीराला संसर्गाविरूद्ध लढण्यास मदत करतात. या पोषकतत्त्वांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकते.
पचन सुधारून गॅसेसचा त्रास कमी होणार
आवळ्याच्या रसात असलेल्या फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस सारख्या आजारांना दूर ठेवता येऊ शकतं. जर तुम्ही दररोज 30 दिवस रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायलात, तर तुम्ही पचनाच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांना दूर ठेऊ शकता.
याशिवाय 30 दिवस दररोज आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची त्वचा देखील निरोगी राहील, विशेषतः जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर ती सुद्धा नाहीशी होईल. याशिवाय केस गळतीचा त्रास असलेल्या लोकांसाठी आवळ्याचा रस गुणकारी आहे. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि त्यांची वाढ होते.
'2 आठवड्यांसाठी सोडा साखर; होतील 'इतके' फायदे की विश्वास बसणार नाही'