हिवाळ्यात ताप आणि घसा खवखवणं यासारखे हंगामी आजार वाढतात. वर्षानुवर्ष केले जाणारे काही उपाय यावर परिणामकारक ठरतात. या नैसर्गिक उपायांमुळे सौम्य हंगामी संसर्गापासून आराम मिळू शकतो. दालचिनी आणि मध हे हंगामी संसर्गांवर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम घटकांपैकी दोन आहेत.
Fatty Liver : फॅटी लिव्हरला silent disease का म्हणतात? शरीरावर काय परिणाम होतात?
advertisement
आयुर्वेदात दालचिनी आणि मध यांचे मिश्रण एक शक्तिशाली औषध मानलं जातं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते - तज्ज्ञांच्या मते, दालचिनी आणि मध या दोन्हींमधे वैयक्तिकरित्या सूक्ष्मजीवरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. दालचिनी पावडर आणि मधामुळे ऊर्जा वाढते आणि मधामुळे ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे संक्रमणांशी लढण्यासाठी शरीर तयार होतं.
दालचिनीच्या दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे घसा खवखवणं कमी करण्यास मदत होऊ शकते.
Fruit Detox : पचनावर निसर्गानं दिलंय उत्तर, रसदार फळं खा, वाचा हेल्दी टिप्स
यात मध मिसळल्यानं नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध होतो. दालचिनी आणि मधाच्या मिश्रणानं चांगल्या बॅक्टेरियाची पातळी वाढू शकते. आतडी निरोगी नसतात तेव्हा शरीर हंगामी संसर्गांना अधिक संवेदनशील होतं. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशा नैसर्गिक उपायांनी संसर्ग रोखणं शक्य होतं.
हे मिश्रण नुसतं किंवा कोमट पाण्यासोबत घेता येतं. मध आणि दालचिनी हे मिश्रण आरोग्यासाठी वरदान आहे. असं असलं तरी समस्या गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
