राधेश्याम सत्यप्रकाश हॉस्पिटलमध्ये 15 वर्षांपासून कार्यरत असणारे बीएमएस डॉक्टर मनोज तिवारी यांनी Local18 शी बोलताना सांगितलं की, खालील घरगुती उपायांमुळे शरीरातील पोषकतत्त्वांची कमतरता दूर होते. या उपायांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे उपाय करता येतात, त्यामुळे शरीर निरोगी राहते.
हे ही वाचा : 9 व्या वर्षी लिटिल चॅम्प, 23व्या वर्षात लग्नगाठ; आई झाल्यानंतर आता कशी दिसतेय कार्तिकी गायकवाड?
advertisement
गुळवेल वनस्पती शरीर फिट ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. गुळवेलचा रस उकळून प्यायल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. तसेच, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गुळवेलच्या नियमित सेवनाने आपण निरोगी राहू शकतो.
तुळशीसारखी औषधी वनस्पती प्रत्येक घराजवळ सापडते. तुळशीचा रस, पानं आणि काढा यामुळे शरीरातील पचनतंत्र मजबूत होतं. याशिवाय, एसिडिटी, थकवा, मानसिक तणाव आणि चिंता यावरही तुळशीचा उपयोग होतो. तुळशीचा नियमित वापर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
हे ही वाचा : मुंबईत मनासारखी थंडी नाहीच, कोकणात पुन्हा पाऊस? IMD कडून मोठा अलर्ट
पपईचा रस आणि पानं शरीरातील प्लेटलेट्सची कमतरता भरून काढतात. प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा वाढवण्यासाठी पपईचा उपयोग होतो. याशिवाय, पपईचा रस देखील अनेक आजारांवर प्रभावी ठरते
