चहा प्यायल्यामुळे थकवा दूर होतो, झोप आल्यासारखं वाटत असेल, तर झोप उडते. काही जणांना कडक चहा प्यायला आवडतो. त्यासाठी काही जण चहा बराच वेळ उकळतात; मात्र चहा बराच वेळ उकळणं शरीरासाठी हानिकारक ठरतं. मग चांगला आणि कडक चहा बनवायचा कसा, ते जाणून घेऊ या. अगोदर पाण्यात चहा पावडर घालावी आणि ते पाणी उकळावं. पाण्यात चहाचा अर्क उतरला, की त्याचा रंग बदलेल. पाण्याचा रंग बदलला, की चहा फक्त दोन मिनिटं उकळावा. तसं केलं तर चांगला, कडक चहा तयार होईल. त्यापेक्षा जास्त वेळ चहा उकळणं प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकतं, असं तज्ज्ञ म्हणतात.
advertisement
अंघोळीनंतर कधीही करु नका 'या' 5 चुका, नाहीतर चेहरा लवकर होईल म्हातारा
चहाला चांगली चव येण्यासाठी अनेक जण चहा पावडरमध्ये लवंग आणि वेलची टाकून ठेवतात; मात्र असं केल्याने लवंग-वेलची या दोन्हींचा सुगंध येत नाही. म्हणून हे घटक वेगवेगळे ठेवावेत. डायबेटीसग्रस्तांना साखरेचा चहा हानिकारक ठरतो. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी चहा करताना त्यामध्ये साखरेऐवजी मध, ब्राउन शुगर, गूळ, लिकोरिस या गोड पदार्थांचा वापर करता येऊ शकतो. यामुळे चहाला गोडवा येईल आणि सामान्य चहापेक्षा त्याला एक वेगळी चव असेल. अर्थात आहारतज्ज्ञ किंवा आपले डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच हे करावं.
आलं, वेलची, तुळस हे पदार्थ चहाची चव वाढवतात. एकत्र बारीक करून उकळत्या पाण्यात हे पदार्थ घातल्यास त्यांची चांगली चव येते. तुळशीचा चहा आवडत नसेल तर त्याऐवजी दोन लवंगा आणि थोडी दालचिनी पावडर चहामध्ये घालू शकता.
