TRENDING:

Tea : चहा जास्त वेळ उकळणं आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञांनी सांगितली चहा बनवण्याची योग्य पद्धत

Last Updated:

काही जण चहा बराच वेळ उकळतात; मात्र चहा बराच वेळ उकळणं शरीरासाठी हानिकारक ठरतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चहा हे बहुतांश जणांचं आवडतं पेय असतं. कित्येक जणांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. अनेक जण तर चहाचे शौकीनच असतात. शिवाय अनेकांना असलेल्या चहाच्या आवडीचं रूपांतर जवळपास व्यसनातच झालेलं असतं. त्यामुळे दिवसातून किती तरी वेळा ते चहा पितात. चहाने तरतरी येते. कामाला उत्साह येतो. एकदम ताजंतवानं वाटतं, असा अनेकांचा अनुभव असतो. चहाची तलफ आली आणि त्या वेळी चहा मिळाला नाही, तर अनेकांना अस्वस्थ वाटतं. जास्त प्रमाणात चहा प्यायला तर त्याचे दुष्परिणाम होतात, हे माहिती असलं तरी चहाची सवय सहजासहजी सुटत नाही. सार्वजनिक ठिकाणी चहाचे स्टॉल्स जिकडेतिकडे असतात, जेणेकरून कोणालाही कधीही चहा प्यावासा वाटला, तर चहा उपलब्ध व्हावा. पुण्यात तर चहाच्या स्टॉल्सचं नाव 'अमृततुल्य' असं असतं. यावरूनच चहाची महती लक्षात येते. आंतरराष्ट्रीय चहा दिवसदेखील साजरा केला जातो.
चहा
चहा
advertisement

चहा प्यायल्यामुळे थकवा दूर होतो, झोप आल्यासारखं वाटत असेल, तर झोप उडते. काही जणांना कडक चहा प्यायला आवडतो. त्यासाठी काही जण चहा बराच वेळ उकळतात; मात्र चहा बराच वेळ उकळणं शरीरासाठी हानिकारक ठरतं. मग चांगला आणि कडक चहा बनवायचा कसा, ते जाणून घेऊ या. अगोदर पाण्यात चहा पावडर घालावी आणि ते पाणी उकळावं. पाण्यात चहाचा अर्क उतरला, की त्याचा रंग बदलेल. पाण्याचा रंग बदलला, की चहा फक्त दोन मिनिटं उकळावा. तसं केलं तर चांगला, कडक चहा तयार होईल. त्यापेक्षा जास्त वेळ चहा उकळणं प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकतं, असं तज्ज्ञ म्हणतात.

advertisement

अंघोळीनंतर कधीही करु नका 'या' 5 चुका, नाहीतर चेहरा लवकर होईल म्हातारा

चहाला चांगली चव येण्यासाठी अनेक जण चहा पावडरमध्ये लवंग आणि वेलची टाकून ठेवतात; मात्र असं केल्याने लवंग-वेलची या दोन्हींचा सुगंध येत नाही. म्हणून हे घटक वेगवेगळे ठेवावेत. डायबेटीसग्रस्तांना साखरेचा चहा हानिकारक ठरतो. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी चहा करताना त्यामध्ये साखरेऐवजी मध, ब्राउन शुगर, गूळ, लिकोरिस या गोड पदार्थांचा वापर करता येऊ शकतो. यामुळे चहाला गोडवा येईल आणि सामान्य चहापेक्षा त्याला एक वेगळी चव असेल. अर्थात आहारतज्ज्ञ किंवा आपले डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच हे करावं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

आलं, वेलची, तुळस हे पदार्थ चहाची चव वाढवतात. एकत्र बारीक करून उकळत्या पाण्यात हे पदार्थ घातल्यास त्यांची चांगली चव येते. तुळशीचा चहा आवडत नसेल तर त्याऐवजी दोन लवंगा आणि थोडी दालचिनी पावडर चहामध्ये घालू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tea : चहा जास्त वेळ उकळणं आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञांनी सांगितली चहा बनवण्याची योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल