TRENDING:

त्वचेपासून ते पोटापर्यंत रामबाण उपाय जिऱ्याचे पाणी, घेण्याची योग्य पद्धत माहितीय का?

Last Updated:

दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरे खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तुमचं आरोग्य यामुळे उत्तम राहू शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येक घरामध्ये जिरे असतातच. हा असा मसाला भारतातील प्रत्येक घरामध्ये मिळतो. स्वयंपाक करताना विविध पदार्थ बनवताना त्यामध्ये चवीसाठी जिरे टाकतात. पण तुम्हाला माहीत आहे का, दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरे खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तुमचं आरोग्य यामुळे उत्तम राहू शकतं.
जीरे पाणी पिण्याचे फायदे
जीरे पाणी पिण्याचे फायदे
advertisement

जिरे खाण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयर्न, कॉपर, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्ससारखे घटक जिऱ्यांमध्ये आढळतात, जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. जिऱ्याच्या पाण्याचं सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. इतकंच नाही तर वजन कमी करण्यासही मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरे खाण्याचे फायदे.

advertisement

त्वचा निरोगी राहते

जिऱ्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे एक अँटिमायक्रोबायल असून, ते शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतं.

मुतखडा ते हृदय रोगावर आहे रामबाण! 'ही' भाजी वजनही करते कमी

पचनक्रिया चांगली राहते

सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये अशी संयुगं असतात जी डायजेस्टिव एन्झाइम्सच्या उत्पादनास गती देतात.

advertisement

वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. जिऱ्यामध्ये असलेले पोषक घटक चरबी जलद बर्न करण्यास मदत करतात.

प्रतिकारशक्ती वाढते

रोज सकाळी जिऱ्याच्या पाण्याचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. चांगली प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून वाचवण्यास मदत करते.

हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायला हवं की नाही? आरोग्यासाठी काय फायदेशीर?

advertisement

ब्लड शुगर नियंत्रण

सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याच्या पाणी प्यायल्यास ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जिऱ्यांमध्ये असलेले हाय फायबर घटक आणि पोषक घटक नैसर्गिकरित्या इन्शुलिन पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

दरम्यान, बहुतांश भारतीय पदार्थ्यांमध्ये जिरे वापरले जातात. आजकाल अनेकांना अपचन, कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्या निर्माण होतात. पण स्वयंपाक घरातील जिऱ्यांचं सेवन या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास उपयुक्त ठरतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर गडगडले, कांद्या आणि सोयाबीनची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

रिकाम्यापोटी जिरे खाल्ल्‍यास आरोग्‍याशी संबंधित अनेक समस्‍या दूर होऊ शकतात. पण जिरे खाण्याचं प्रमाणही योग्य असणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी नियमित जिऱ्यांचं सेवन करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
त्वचेपासून ते पोटापर्यंत रामबाण उपाय जिऱ्याचे पाणी, घेण्याची योग्य पद्धत माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल