यासाठी, 960 महिला क्षयरोग रुग्णांच्या अभ्यासातून आलेला निष्कर्ष पाहूयात. सुमारे एकोणसत्तर टक्के महिलांना क्षयरोगाचं गांभीर्य आणि उपचारांचं महत्त्व समजतं. आरोग्यविषयक जागरूकता असली तरी, लक्षणीय संख्येनं महिलांना अजूनही आपला आजार लपवावा लागतो.
यामागची कारणं म्हणजे समाजाची भीती, नातेसंबंध तुटण्याची भीती आणि आदर गमावण्याची चिंता. यामुळे केवळ मानसिक ताणच वाढत नाही, तर त्यांना आवश्यक आधारापासूनही वंचित राहावं लागतं. क्षयरोग ग्रस्त असलेल्या सुमारे 44 टक्के महिला सामाजिक कार्यांपासून दूर राहतात. तिरस्कार टाळण्यासाठी त्या असं करतात. क्षयरोगाचा महिलांच्या वैवाहिक जीवनावर सर्वात गंभीर परिणाम होतो, ज्यात सुमारे अठरा टक्के महिलांना त्यांच्या पतीकडून किंवा सासरच्या मंडळींकडून नकाराचा सामना करावा लागतो.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे दहा टक्के प्रकरणांत क्षयरोगामुळे विवाह मोडलेत. त्याच वेळी, चाळीस टक्के महिलांना समाजानं 'आजारी' आणि 'अयोग्य' मानल्यामुळे लग्नास नकार दिला. पुरुष क्षयरोग रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून, विशेषतः त्यांच्या पत्नीकडून पूर्ण पाठिंबा मिळतो, तर महिला रुग्ण या पाठिंब्यापासून वंचित राहतात.
टीबीचं निर्मूलन करण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार पुरेसे नाहीत. यासाठी सामाजिक बदल आवश्यक आहे. विशेषतः महिलांसाठी लिंग-संवेदनशील कार्यक्रमांची गरज आहे, जेणेकरून त्यांना एकटेपणा जाणवणार नाही.
जगभरात दरवर्षी अंदाजे एक कोटी जणांना टीबीचं निदान होतं, त्यापैकी 28 लाख रुग्ण भारतात आहेत. टीबी शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. फुफ्फुसांमधील क्षयरोगाला फुफ्फुसीय क्षयरोग (पल्मोनरी टीबी) म्हणतात आणि शरीराच्या इतर भागांतील क्षयरोगाला फुफ्फुसेतर क्षयरोग (एक्स्ट्रापल्मोनरी टीबी) म्हणतात. भारतातील सुमारे ऐंशी टक्के क्षयरोग रुग्णांना फुफ्फुसीय क्षयरोग असतो.
क्षयरोगाची लक्षणं
ही लक्षणं हळूहळू विकसित होतात आणि अनेक आठवडे टिकू शकतात.
दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकणारा सततचा खोकला.
खोकल्यातून कफ पडणं.
खोकल्यातून रक्त पडणं.
श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणं.
धाप लागणं.
दीर्घकाळ टिकणारा ताप, जो संध्याकाळी वाढतो.
रात्री घाम येणं.
दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवणं.
भूक न लागणं.
वजन कमी होणं.
टीबी टाळण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला किंवा टीबीची इतर लक्षणं असतील, तर थुंकीची तपासणी आणि छातीचा एक्स-रे करून घ्यावा. थुंकीमधे टीबीचे जिवाणू आहेत का हे पाहण्यासाठी चाचण्या केल्या जातात. या सर्व चाचण्या सरकारी रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांमधे विनामूल्य केल्या जातात.
क्षयरोगाच्या रुग्णाच्या संपर्कात येणं, कुपोषण, एचआयव्ही, मधुमेह, कमी वयात गर्भधारणा आणि महिलांची वारंवार होणारी गर्भधारणा, पडदा पद्धत, लाकडी चुलीवर स्वयंपाक करणं, वायू प्रदूषण, धूम्रपान आणि इतर व्यसनं, स्वच्छतेचा अभाव, आणि अस्वच्छ आणि दाट लोकवस्तीच्या भागात राहणं यांसारख्या घटकांमुळे क्षयरोगाचा धोका वाढतो.
Hair Care : केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोजमेरी, कांद्याचं तेल वापरुन पाहा, केस होतील मजबूत
क्षयरोगावर उपचार कसे केले जातात?
वेळेवर आणि संपूर्णपणे उपचार केले, तर क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.
यावर सहा ते नऊ महिने चालणारे उपचार केले जातात. औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणं महत्त्वाचं आहे, अन्यथा जिवाणू औषधांना प्रतिरोधक बनू शकतात आणि त्यामुळे बहु-औषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB) होऊ शकतो, ज्यावर उपचार करणं आणखी कठीण असतं. एमडीआर-टीबीवरील उपचार अंदाजे दोन वर्षे चालतात आणि या औषधांचे दुष्परिणाम अधिक असतात.
क्षयरोग टाळण्यासाठी चांगल्या सवयी महत्त्व
वैयक्तिक स्वच्छता राखा आणि खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यूचा वापर करा. इतरांमधे जिवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित व्यक्तींनी मास्क घालावा.
संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढू शकते.
धूम्रपान, मद्यपान, लाकडी चुलीवर स्वयंपाक करणं यामुळे देखील क्षयरोगाचा त्रास वाढतो.
क्षयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मधुमेह, फुफ्फुसांचे आजार, कर्करोग, हृदयरोग इत्यादींवरही योग्य उपचार करणं आवश्यक आहे.
