तेल सारखं गरम केल्याने काय होईल?
ICMR ने सांगितल्या प्रमाणे वनस्पती तेल सारखं गरम केल्याने त्यात हानिकारक घटक निर्माण होतात. ज्यामुळे हृदय रोग किंवा कॅन्सरचा धोका वाढू शकतो. उच्च तापमानात तेलातील काही चरबी ट्रान्स फॅटमध्ये बदलतात. ट्रान्स फॅट्स ही हानिकारक चरबी आहे ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जेव्हा तेलांचा पुनर्वापर केला जातो तेव्हा ट्रान्स फॅटचे प्रमाण वाढते.
advertisement
Lemon : लिंबासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 4 पदार्थ; पोटात तयार होईल विष! नको ते दुखणं येईल
अनेकदा तळण्यासाठी खूप तेल कढईत गरम केलं जात मात्र त्याचा वापर नंतर होत नाही. ICMR ने सांगितल्या प्रमाणे तुम्ही असे तेल भाजी किंवा डाळ बनवण्यासाठी वापरू शकता. तसेच एकदा तेल तळण्यासाठी वापरल्यावर त्या तेलाचा वापर पुन्हा तळण्यासाठी करू नये. तसेच एकदा वापरलेलं तेल हे जास्तीत जास्त एक ते दोन दिवस वापरावे.
कोणत्या तेलाचा वापर करावा?
वनस्पती तेल सारखे गरम केल्याने त्यात ट्रान्स फॅट्सचं प्रमाण वाढू शकत. ज्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढा वापर आहे तेवढ्याच तेलाचा वापर करावा. कॅन्सर आणि हृदयविकाराचे धोके टाळण्यासाठी एकाच तेलाचा जेवण बनवण्यासाठी सारखा वापर करणे टाळा. तुम्ही ॲव्होकॅडो किंवा करडई तेल यांसारखे उच्च धुराचे तेल वापरणे योग्य ठरू शकते. तसेच तेल योग्य तापमानावर तापवणे सुद्धा महत्वाचे आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी जेवणकरता ताज्या तेलाचा वापर करावा. जर तुम्ही हे तेल जेवणासाठी वापरणार नसाल तर दिवा पेटवण्यासाठी सुद्धा तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.