TRENDING:

Thirst : बाहेरच्या खाण्यानंतर सतत पाणी का प्यावंसं वाटतं ? जाणून घ्या घरचं अन्न खाण्याचं महत्त्व

Last Updated:

घरी शिजवलेलं अन्न आणि बाहेर शिजवलेलं अन्न यात खूप फरक आहे, आणि म्हणूनच बाहेरचं अन्न खाणं पौष्टिक असतंच असं नाही. बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर जास्त तहान का लागते ते समजावून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बाहेर कितीही जेवण केलं तरी घरच्या अन्नानं पोट चांगलं भरतं. कारण, घरी बनवलेलं अन्न शरीरासाठी औषधासारखं काम करतं, तर बाहेरच्या अन्नामुळे शरीरात सुस्ती आणि आळस भरतो. बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर खूप तहान लागते आणि सतत पाणी प्यायची इच्छा होते.
News18
News18
advertisement

घरी शिजवलेलं अन्न आणि बाहेर शिजवलेलं अन्न यात खूप फरक आहे, आणि म्हणूनच बाहेरचं अन्न खाणं पौष्टिक असतंच असं नाही. बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर जास्त तहान का लागते ते समजावून घेऊ.

Cancer : शरीरात नकळतपणे होतो कर्करोगाचा शिरकाव, वेळीच व्हा सावध

तुम्ही घरी चार पोळ्या आणि भाज्या खाल्ल्या तरी बाहेर दोन पोळ्या खाल्ल्यानंतर तुम्हाला जितकी तहान लागते तितकी तहान घरी लागत नाही. सोडियम हे यामागील मुख्य कारण आहे.

advertisement

जास्त तेलकट आणि जड अन्न हे देखील प्रमुख कारण आहे. घरी शिजवलेल्या जेवणाच्या तुलनेत, बाहेरच्या जेवणात सोडियम आणि तेल जास्त असतं. चव वाढवण्यासाठी प्रक्रिया केलेले पीठ आणि मीठ बहुतेकदा वापरलं जातं. शरीरातील जास्त मीठामुळे द्रवपदार्थाचं संतुलन बिघडतं आणि हे दुरुस्त करण्यासाठी शरीर जास्त पाणी वापरतं. पेशी मेंदूला अधिक पाण्याची आवश्यकता असल्याचे संकेत देतात. यामुळे वारंवार तहान लागते.

advertisement

Skin Care : घरात तयार होऊ शकेल असा झटपट फेसपॅक, वाचा खास स्किन केअर टिप्स

दुसरं कारण म्हणजे जास्त प्रमाणात अन्न खाणं. जड अन्न पचवण्यासाठी शरीराला साधं अन्न पचवण्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. तसंच, तेलकट किंवा प्रथिनयुक्त अन्न खाल्लं असेल, तर या प्रक्रियेत पोटाला प्रथिनांचं विघटन करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते आणि यासाठी शरीराला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

घरी असतानाही, जेव्हा आपण तेलात तळलेली पुरी किंवा भजी खातो, तेव्हा आपल्याला दिवसभर तहान लागते आणि पोट भरल्यासारखं वाटतं. तहान भागवण्यासाठी फक्त पाणी पुरेसं नाही. सतत तहान लागल्यावर फक्त साधं पाणी पुरेसं नाही. तहान भागवण्यासाठी ताक खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे तहान तर भागतेच पण पचनालाही मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Thirst : बाहेरच्या खाण्यानंतर सतत पाणी का प्यावंसं वाटतं ? जाणून घ्या घरचं अन्न खाण्याचं महत्त्व
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल