मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून टेक ऑफ केलं होतं. हे विमान ४० मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला. पायलटने सुरक्षित लँडींग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं.
advertisement
नेमकं काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकाने सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला. लँडिंगदरम्यान विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
तपास यंत्रणांच्या मते, 'ब्लॅक बॉक्स' (Black Box) हाती आल्यानंतरच या दुर्घटनेचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट होईल. विमानाच्या उड्डाणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा सर्व डेटा आणि वैमानिकांचे संभाषण यात रेकॉर्ड केलेले असते, त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
विमान अपघातात कुणा-कुणाचा मृत्यू झाला?
खासगी VSR कंपनीचे विमान
एकूण प्रवासी 05
1. माननीय अजित दादा पवार साहेब
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
