संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी माध्यमांसहित महाराष्ट्र लढला. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचे क्रौर्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. परंतु असे असतानाही एवढ्या क्रूर व्यक्तीची निवडणुकीत आठवण काढली जात असेल तर काय बोलायचे? अशा व्यक्तीला चपलांचा हार घातला पाहिजे, परळीकरांनी त्यांना निवडून दिले तर आयुष्यात परळीत पाय ठेवणार नाही, अशी शपथ अंजली दमानिया यांनी घेतली. त्या न्यूज १८ लोकमतशी बोलत होत्या.
advertisement
परळीकरांनो, आयुष्यात धनंजय मुंडे यांना निवडून देऊ नका
सरपंच देशमुखांना एवढ्या क्रूरपणे संपविणाऱ्या टोळीच्या प्रमुखाची आठवण धनंजय मुंडे यांना येत असेल तर संतापाचा कडेलोट होतो. असली थर्ड क्लास माणसे आपल्या आजूबाजूला आहेत, याचा उबग येतो. असे असतानाही परळीकरांनी त्यांना निवडून दिले तर त्यांना कर्माची फळे भोगावी लागतील. माझे परळीकरांना आवाहन आहे की त्यांनी उभ्या आयुष्यात धनंजय मुंडे यांना निवडून देऊ नये. परळीकरांनी जर धनंजय मुंडे यांना निवडून दिले तर मी कधीच परळीत पाय ठेवणार नाही, असे दमानिया म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांना चपलाचा हार घातला पाहिजे
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कराड टोळीचे क्रौर्य महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांना शासन झाले पाहिजे, यासाठी महाराष्ट्राने लढा लढला. परंतु आता परळीकरांनी लढा देण्याची वेळ आहे. अशा क्रूरकर्मा माणसाची आठवण धनंजय मुंडे यांना येत असेल तर त्यांना चपलाचा हार घातला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.
निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांचं इमोशनल कार्ड
वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सहकाऱ्यासाठी खुलेपणाने बाजू मांडली नाही, असे अप्रत्यपक्षणे सांगत कराड कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच राजकीय क्षेत्रात भरारी घेत असताना राजकीय कट रचून त्यांना अडकविण्यात आल्याचा गंभीर आरोप कराड कुटुंबियांनी केला. यामुळेच धनंजय मुंडे यांनी वाल्मिकची आठवण करून नगर परिषद निवडणुकीवेळी भावनिक खेळी खेळल्याचे देखील बोलले जाते. दुसरीकडे वाल्मिक कराड याला मानणारी हजारो मते परळी शहरात आहे. त्यांची मते आपल्या हातून सुटू नयेत, याची काळजी धनंजय मुंडे यांनी घेतल्याचे दिसून येते.
