TRENDING:

Thane Mahapalika : ठाण्याच्या राजकारणात आणखी एका रिक्षावाल्याची एन्ट्री, महापालिका निवडणुकीतला जाएंट किलर!

Last Updated:

ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये रिक्षाचालक हा जाएंट किलर ठरला आहे, त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात आणखी एका रिक्षावाल्याची एन्ट्री झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत जिंकलेल्या एमआयएम नगरसेवक सहर शेखची देशभरात चर्चा आहे. सहर शेखच्या विजयानंतर तिने केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे सहर शेखची चर्चा सुरू असतानाच निवडणूक लढलेले रिक्षाचालक जाएंट किलर ठरले आहेत. रिक्षाचालक असलेले नफीस अन्सारी हे एमआयएमच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.
ठाण्याच्या राजकारणात आणखी एका रिक्षावाल्याची एन्ट्री, महापालिका निवडणुकीतला जाएंट किलर!
ठाण्याच्या राजकारणात आणखी एका रिक्षावाल्याची एन्ट्री, महापालिका निवडणुकीतला जाएंट किलर!
advertisement

ऑटोरिक्षा चालक असलेल्या नफीस अन्सारी यांनी मुंब्रामधील वॉर्ड क्रमांक 30 मधून निवडणूक जिंकली, जो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. 'वॉर्डमधील सर्व नागरिकांसाठी नगरसेवक म्हणून काम करू, जरी त्यांनी मला मत दिलं असो किंवा नसो', अशी प्रतिक्रिया नफीस अन्सारी यांनी या विजयानंतर दिली आहे.

'वॉर्डमध्ये रिक्षा चालवत असताना चुकीची कामं दिसायची. नागरिकांना रोज समस्यांचा सामना करावा लागत होता. या समस्या सोडवण्यासाठी मी काय करू शकतो? हे मी लोकांना समजवून सांगायचो. मी आधीपासूनच प्रचार सुरू केला होता. एमआयएमने मला दिलेल्या संधीचं मी सोनं केलं', असं नफीस अन्सारी म्हणाले आहेत. निवडणुकीच्या काळात नफीस अन्सारी यांनी त्यांच्या रिक्षेमधून फिरूनच प्रचार केला होता.

advertisement

रिक्षाचालक असलेले नफीस अन्सारी हे अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात. मागच्या निवडणुकीमध्ये अन्सारी यांना जिंकण्यात यश आलं नाही, पण त्यानंतरही ते खचून गेले नाहीत. आता निवडणूक जिंकल्यानंतर फेरीवाल्यांविरुद्ध लढणे, स्वच्छ पाणी आणि राखीव भूखंड मुक्त करणे, हे आपलं प्राधान्य असेल, असं नफीस अन्सारी म्हणाले आहेत.

ठाणे महापालिकेचा निकाल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 75 जागा, भाजपला 28, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा हा बालेकिल्ला मानला जातो. जितेंद्र आव्हाड मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार आहेत. आव्हाडांनी महाराष्ट्रात वेगवेगळी मंत्रिपदंही भूषावली आहेत, पण आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Mahapalika : ठाण्याच्या राजकारणात आणखी एका रिक्षावाल्याची एन्ट्री, महापालिका निवडणुकीतला जाएंट किलर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल