पाणी दूषित असल्याचं कसं कळलं?
सत्यसाईनगरमधील एक व्यक्ती रक्तदान शिबिरात गेला होता. तेव्हा त्याला हिपॅटायटीस-बी पाॅझिटिव्ह असल्याचं कळलं. त्यानंतर एका खासगी लॅब ब्लड टेस्ट केली, तर तिथेही हेच निदान झालं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबाने घरातील पिण्याचं पाणी प्रयोगशाळेत तपासलं, तेव्हा त्यात काॅलिफाॅर्म आणि ई-कोलाई आढळून आले. त्यामुळे या भागातील पाणी दूषित असल्याचं स्पष्ट झालं.
advertisement
हे जीवाणू पाण्यात येतात कुठून?
मानवी आणि प्राण्यांच्या मलमूत्रातून कॉलिफॉर्म हे जीवाणू पाण्यात येतात. या जीवाणुंमुळे मानवी आरोग्य बिघडलं. जुलाब, उलटी, पोटदुखी, कावीळ असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे सत्यसाईनगरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने, तसेच आरोग्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित व्यक्तीच्या घरातून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
हे ही वाचा : Kolhapur News: गणेशोत्सव करावा की, टँकरमागे पळावं? कोल्हापूरात पाण्याची बोंबाबोंब; प्रशासन करतंय काय?
हे ही वाचा : रेल्वे प्रवाशांनो, इकडे लक्ष द्या! प्रवासात 'लगेज'साठीही मोजावे लागणार पैसे, नियमभंग झाल्यास होणार 'इतका' दंड
