याशिवाय, नेमकी ही घटना कशी घडली? ती प्रियकरासोबत कशी पळून गेली? कुटुंबीयांना कसा चकवा देण्यात आला? याची सगळी माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. तिने एका प्रतिज्ञापत्रावर ही माहिती दिली.
तरुणीला कसं पळवलं?
पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून २० मिनिटांनी घडली. घटनेच्या दिवशी मुलीची आई आणि भाऊ तिला घेऊन भिगवण येथील बाजारपेठेमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार होते. याची माहिती स्वत: तरुणीने प्रियकराला दिली होती. तसेच तू भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागे येवून थांब. मी आई आणि भावाची नजर चुकवून तुझ्या सोबत निघून येणार आहे, असा फोन तिने तरुणाला केला होता.
advertisement
तरुणीने सांगितल्यानुसार, प्रियकर तरुण भिगवण येथील रेस्ट हाऊस जवळील आनंद हॉटेलच्या पाठीमागे एक टेम्पो गाडी घेऊन उभा होता. हे तिघेही मार्केटमध्ये आले असता तरुणीने आई आणि भावाची नजर चुकवून टेम्पोच्या दिशेनं पळ काढला आणि टॅम्पोत जाऊन बसली. यानंतर ती प्रियकराला घेऊन नगरच्या दिशेने गेले. पळून जात असताना तरुणीने आपल्या भावाला कॉल केला. पळून जात असल्याची माहितीही दिली.
नगरच्या दिशेनं गेलेला टॅम्पो साताऱ्यात पोहोचला
तरुणीने पुढे सांगितलं की, आम्ही सुरुवातीला नगर दिशेने गेलो होतो. त्यानंतर नगरच्या बाहेरील बायपासने पुन्हा पुणे रोडने हडपसरला पोहोचलो. हडपसरवरून सासवड मार्गे सातारा जिल्ह्यातील वाठार बसस्टॉपला जाऊन थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो. मात्र बातम्यांमध्ये माझं अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली. पण ही तक्रार खोटी आहे. ही तक्रार माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा कोणाच्यातरी दबावावरून दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नाही. मी स्वतः माझ्या मर्जीने तरुणाबरोबर निघून आली आहे. मला या पुढील आयुष्य त्याच्यासोबतच काढायचं आहे. या प्रकरणात त्याला किंवा इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये, असंही तरुणीने सांगितलं.
