TRENDING:

Devendra Fadnavis : ''हाच माझा बदला...'', बदल्याचा राजकारणावर फडणवीस स्पष्टच बोलले

Last Updated:

. मी स्वप्ल काय अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो.आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले,अशी टीका त्यांनी ठाकरे-पवारांवर केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Devendra Fadnavis News : 2019 मध्ये भाजप शिवसेनेने युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. निकालानंतर मात्र मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नसल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे युतीतून बाहेर पडले होते. त्यानंतर ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन मविआचे सरकार स्थापन केले होते. पण अडीच वर्षानंतर हे सरकार पडले. त्यानंतर फडणवीसांनी माझ्यासोबत झालेल्या बेईमानाची मी बदला घेतला. म्हणजे हे सरकार आपणच पाडल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर आता
devendra fadnavis maharashtra new cm
devendra fadnavis maharashtra new cm
advertisement

बदल्याच्या राजकारणावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी बदल्याच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे.त्यांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला आहे. मी स्वप्ल काय अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो.आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले,अशी टीका त्यांनी ठाकरे-पवारांवर केली. त्याचसोबत महायुतीवर, भाजपवर आणि माझ्यावर जनतेने मोठा विश्वास विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर सडेतोड उत्तर दिले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

advertisement

तसेच नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर आर्थिक शिस्तीसाठी अनेक योजनांना कात्री बसणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात आर्थिक शिस्तीची नक्कीच गरज आहे. त्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना आणि अल्पकालीन उपाययोजना अशा दोन्ही पातळ्यांवर काम करावे लागेल, असे फडणवीसांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

आर्थिक शिस्त म्हणजे लोकाभिमूख योजनांना कात्री लावणे, असा अर्थ होत नाही. त्या सुरु ठेवण्याबरोबरच राज्याचे उत्पन्न वाढणे,औद्योगिक गुंतवणुकीसह विविध क्षेत्रात राज्य अव्वल स्थानी ठेवणे हे महत्वाचे आहे.खर्च, उत्पन्नाचे अचूक भान ठेवत आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : ''हाच माझा बदला...'', बदल्याचा राजकारणावर फडणवीस स्पष्टच बोलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल