मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली होती. तसेच नुकतेच झालेल्या दसरा मेळाव्यातही जरांगे पाटलांनी मुंडेंवर निशाणा साधला होता. त्याची परतफेड मुंडेंनी आपल्या भाषणात केली. धनंजय मुंडे म्हणाले की, दोन अडीच महिने गप्पच होतो. ओबीसीत का यायचं आहे तर मूठभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचं आहे, यांना पेटवायचं आहे. पेटवून पेटवून काय म्हणतो. कधी कधी माणूस असण्याची, जिवंत असण्याची हे ऐकून कसं सहन करावं याची मनाला भीती वाटते.
advertisement
मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं आणि माझं काहीच सोडलं नाही. मला तर कधीपासून पाडीतोच म्हणतो. भुजबळ साहेबांनाही म्हणतो, पाडीतोच. अरे 1 लाख 42 हजार मतांनी आलो. पाडितो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतो. आज आपल्या ओबीसींचं आरक्षण न्याय हक्कासाठी हा एल्गार मोर्चा आहे. आपल्या हक्काचं आरक्षण कुणाला देऊ द्यायचं नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
मुंडेंच्या टीकास्त्रामुळे वादाचा भडका उडाला नाही तरचं नवलं. आता हा वाद शिंगावर घेण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील हे एकच जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यातला वाद काही लपून राहिला नाही. आता ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं या संघर्षाला चांगलीच धार आली आहे.