मुरूड तहसीलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. समुद्रात सोसाट्याचा वारा आणि मोठा लाटा उसळत असल्याने मासेमारीच्या बोटी तात्काळ आगरदांडा खाडीत बोलावण्यात आल्या आहेत. परिणामी ऐन नवरात्रीत मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. कोळी बांधव देवीला माशांचा नैवेद्य दाखवत असतात. मासेमारी बंद असल्यामुळे ताज्या माशांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
Google Map Mistake: गुगल मॅपने गंडवलं अन् पुरात आणून सोडलं, 7 प्रवाशांची सुखरुप सुटका
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. किनारपट्टीलगत ताशी 49 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बंदरांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या शेकडो बोटी मुरुडच्या किनाऱ्यावर विसावल्या आहेत.
पुढील काही दिवसात पावसाचा जोर कमी होण्याच शक्यता आहे. त्यानंतर मच्छीमारी बोटी मासेमारीसाठी रवाना होतील, असे मच्छीमार बांधवांकडून सांगितलं जात आहे. मुरुड तालुक्यात नवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी सार्वजनिक उत्सव सुरू आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे उत्सवाच्या कार्यक्रमांवर विरजण पडलं आहे.
मुरूड -खारअंबोली गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुड शहरासह पंचक्रोशीत यंदा चांगला पाऊस झाला आहे. पण, सध्या पडणारा पाऊस शेतीसाठी धोकादाय ठरू शकतो. भातशेतीला करपा रोगाचा सामना करावा लागू शकतो. भाज्यांच्या मळ्यांचं आणि बागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.