विदर्भ-मराठवाड्याला दिलासा:
विदर्भ आणि मराठवाड्यात 75 हजार कोटींची गुंतवणूक मिळणार आहे. ज्यामुळे 19 हजार जणांना रोजगार मिळणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्रात जवळपास 81 हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात राज्याला यश आलं आहे.ग्रीन एनर्जी, ग्रीन मोबिलिटी आणि सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक या निमित्ताने येत आहे.
मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मोठे निर्णय:
advertisement
अवाडा इलेक्ट्रो लिमिटेड 13 हजार कोटींची गुंतवणूक नागपुरात तर पनवेलमध्ये 650 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ज्यामुळे 8 हजार जणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. ही बाब बेरोजरागीने त्रस्त असणाऱ्या तरूणांसाठी निश्चितच दिलासादायक आहे. तर अवाडा इलेक्ट्रो कंपनी ही सोलर पीव्ही मोड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझर निर्मितीचे काम करते. जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीकडून 25 हजार कोटींची नागपुरात गुंतवणूक करण्यात येत आहे. ही कंपनी जगविख्यात आहे. 5 हजार जणांना कायमचा रोजगार यामुळे मिळणार आहे.लिथियम बॅटरी निर्मितीत जेएसडब्ल्यूकडून गुंतवणूक करण्यात येत आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी वाट बघावी लागणार? शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ
दुसरीकडे सर्वात महत्वाची बाब म्हणजे संभाजीनगरमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटीकडून 27 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. संभाजीनगरमध्ये 5 हजार 200 जणांना कायमाचा रोजगार या उद्योगामुळे मिळेल, असा दावा केला जात आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीत जेएसडब्ल्यू कंपनीचे पाऊल यानिमित्ताने पडते आहे. पर्नोड रिकार्ड कंपनीकडून देखील जवळपास 1875 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. यामुळे 800 जणांना रोजगार मिळणार आहे. एकंदरीतच ऐन विधासभेच्या तोंडावर राज्यात मोठी गुंतवणूक येणार अशी घोषणा करण्यात आली आहे, विरोधी गटाकडून राज्यसरकारला सातत्याने या संदर्भात प्रश्न विचारले जात होते, टीका होत होती. कुठेतरी थोडा का होईना, या गुंतवणूकीमुळे दिलासा मिळणार आहे.