पाऊस थांबला, पण घाम सुटेना!
सध्या पाऊस थांबला असला तरी लोकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हवेतील आर्द्रता. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीमध्ये प्रचंड ओलावा साठला आहे. आता जसं ऊन पडतंय, तशी या ओलाव्याची वाफ होऊन हवेत दमटपणा वाढला आहे. ६ आणि ७ एप्रिलला जरी तापमानाचा आकडा ३५-३६ च्या आसपास दिसत असला, तरी प्रत्यक्षात तो ४० अंशासारखा भासत आहे.
advertisement
Farmer Loan : राज्यातील शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर
पुढील ७ दिवसांचा नेमका अंदाज काय?
हवामान अभ्यासक नीलेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिलपासून राज्यावरील पावसाचे ढग पूर्णपणे विरले आहेत. आता आकाश स्वच्छ आणि कोरडं होणार आहे. ७ ते १० एप्रिल या काळात वातावरण पूर्णपणे निरभ्र राहील. याचा अर्थ असा की, सूर्याची किरणं थेट जमिनीवर पडणार असून तापमानात झपाट्याने वाढ होणार आहे. दिवसाचं तापमान ३६ अंशांपासून सुरू होऊन अवघ्या चार-पाच दिवसांत ४० अंशांहून अधिक राहण्याची शक्यता आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे रात्रीचं तापमान १९ ते २१ अंशांच्या दरम्यान स्थिर राहील. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुखद गारवा जाणवेल. पण १० एप्रिलनंतर मात्र रात्रीचाही उकाडा वाढण्याची चिन्हं आहेत.
पश्चिमी विक्षोभाचा काय परिणाम होणार?
उत्तर भारतात ७ एप्रिलपासून पुन्हा एकदा एक नवीन 'पश्चिमी विक्षोभ' सक्रिय होत आहे. साधारणपणे यामुळे आपल्याकडे पाऊस येतो, पण यावेळी जळगावकर आणि उत्तर महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी ही आहे की, या विक्षोभाचा प्रभाव आपल्यावर अत्यंत कमी असेल. त्यामुळे या आठवड्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस येण्याची धास्ती आता बाळगण्याची गरज नाही. हवामान आता स्थिर झालं असून केवळ 'उन्हाळा' हाच मुख्य ऋतू अनुभवायला मिळेल.
शेतकऱ्यांना मोठा धक्का! प्रसिद्ध ट्रॅक्टर कंपनीने दरवाढीचा घेतला निर्णय, कधीपासून होणार लागू?
शेतकऱ्यांनो, आता सावध व्हा!
विदर्भ वगळता गारपिटीचा कुठेही इशारा देण्यात आलेला नाही. पावसानं आधीच पिकांचं अतोनात नुकसान केलं आहे. आता वाढत्या उन्हामुळे बागायतदारांची चिंता वाढणार आहे. १० एप्रिलनंतर उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय होऊ शकते. त्यामुळे केळी, संत्रा आणि इतर फळबागांना पाणी देताना वेळापत्रक पाळावं लागणार आहे. दुपारच्या वेळी बागांना पाण्याची कमतरता भासू देऊ नका, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
