परतूर तालुक्यातील सोयंजना गावातील वैजनाथ ढवळे यांची ही बैलजोड आहे. ढवळे हे स्वत: प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे त्यांनी सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्ये बैलांच्या पाठीवर लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून देत अनोख्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला आहे.
दरम्यान सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.मात्र सत्तेत आल्यानंतही सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्ये बैलांच्या पाठीवर लिहून सरकारला कर्जमाफीची आठवन करून दिली आहे.
advertisement
या पोळ्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्याला यश देण्यासाठी आपल्या बैलावर सातबारा कोरा कोरा आणि शेतकरी कर्जमाफी हवीच, हे घोषवाक्य लिहण्याचं आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केलं होतं. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलावर सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्ये लिहली आहेत.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यात 138 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या पदयात्रेला शिवसेना युबीटी आणि मनसेने पाठिंबा जाहीर केला होता.
