जालना जिल्ह्यामध्ये एकूण 67 लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत. साठ लघु प्रकल्प तर सात मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये सरासरी 69.53 टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध झाला आहे. सात मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याची सरासरी 81 टक्क्यांच्या आसपास आहे तर 60 लघु प्रकल्पातील पाणीसाठ्याची सरासरी ही 63 टक्के एवढी आहे.
हजारो हेक्टर शेती पाण्यात वाहून गेली, सोलापुरात पावसाचा हाहाकार; शेतीची बिकट अवस्था
advertisement
सात मध्यम प्रकल्पांपैकी कल्याण गिरीजा, अप्पर दुधना, जीवरेखा आणि गल्लाटी हे चार मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले असून ते ओव्हर फ्लो झाले आहेत. तर कल्याण मध्यम प्रकल्पात 64.65 टक्के जुई मध्यम प्रकल्प 90.55 टक्के आणि धामणा मध्यम प्रकल्पामध्ये 43.28 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
साठ लघु प्रकल्पांपैकी 44 लघु प्रकल्प हे 75 टक्के ते शंभर टक्क्यांच्या दरम्यान भरले आहेत. तर जोता पातळीखाली एकूण पाच प्रकल्प आहेत. 25 पेक्षा कमी पाणीसाठा असलेले दोन प्रकल्प आहेत. 25 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान तीन प्रकल्प तर 50 टक्के ते 75 टक्के पाणीसाठा असलेले सहा प्रकल्प आहेत, अशी माहिती जालना लघुपाटबंधारे विभाग येथील अनुरेखक शुभांगी घुर्डे यांनी दिली.