TRENDING:

Jan Dhan account : महत्त्वाची बातमी! जनधन खातेधारकांनो 30 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा खाते होईल बंद

Last Updated:

Government Scheme : आपले खाते सक्रिय ठेवण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत आवश्यक KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर आपण ही प्रक्रिया वेळेवर केली नाही, तर आपले जनधन खाते बंद केले जाऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुमच्या जनधन खात्याला 10 वर्षे पूर्ण झाल्यावर एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे.. जर हे काम केले नाही, तर तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. याचा अर्थ असा की खात्यातून पैसे काढणे, जमा करणे किंवा सरकारी सबसिडी मिळवणे, सर्व काही थांबू शकते. त्यामुळे तुमचे जनधन खाते सुरक्षित आणि सक्रिय राहावे, तसेच सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकेल यासाठी 30 सप्टेंबर 2025 पूर्वी री-केवायसी करणे खूप आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

सरकारने जनधन खातेधारकांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत री-केवायसी शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांमध्ये खातेदार फक्त आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा घेऊन केवायसी पूर्ण करू शकतात. री-केवायसी म्हणजे नो युजर कस्टमरची माहिती अपडेट करणे. या प्रक्रियेत, तुम्हाला तुमचा नवीन पत्ता, मोबाईल नंबर किंवा इतर महत्त्वाची माहिती बँकेला देणे आवश्यक आहे. हे अपडेट आधीच्या रेकॉर्डपेक्षा वेगळे असू शकते. बँक या प्रक्रियेद्वारे खात्याचे योग्य व्यक्तीच्या नावावर असणे आणि त्याचा गैरवापर होऊ नये हे सुनिश्चित करते.

advertisement

आरबीआय गव्हर्नरांच्या निर्देशानुसार, जनधन योजनेला 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे लाखो खात्यांचे री-केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी बँका 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रत्येक पंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करत आहेत. येथे जनधन खातेधारक सहज री-केवायसी करू शकतात. हे शिबिरे केवळ केवायसीसाठी नसून लोकांना अनेक सरकारी योजनांशी जोडण्यासाठी देखील आहेत.

advertisement

केवायसी केल्यास खालील योजनांचा लाभ घेता येईल:

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) – वार्षिक फक्त 330 रुपयांत 2 लाख रुपयांचा जीवन विमा.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) – वार्षिक फक्त 12 रुपयांत 2 लाख रुपयांचा अपघात विमा.

अटल पेन्शन योजना (APY) – वृद्ध व्यक्तींसाठी मासिक पेन्शन1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत मिळवणे सोपे.

advertisement

पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी सांगितले की आतापर्यंत देशात 55 कोटी जनधन खाती उघडण्यात आली असून लाखो लोकांनी यशस्वीरित्या री-केवायसी केले आहे. ते प्रत्येक खातेदाराला लवकरात लवकर केवायसी अपडेट करण्याचे आवाहन करत आहेत, जेणेकरून खाते सक्रिय राहील आणि सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

जनधन योजनेचे फायदे:

खाते कोणत्याही किमान शिल्लकशिवाय उघडता येते.

advertisement

जमा रकमेवर व्याज मिळते.

रुपे डेबिट कार्डसह 1 लाख ते 2 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध आहे.

पात्र खातेदारांना 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.

डीबीटी अंतर्गत सरकारी अनुदान थेट खात्यात जमा होते.

री-केवायसीसाठी तुम्ही तुमच्या बँकेत किंवा शिबिरात जाऊन आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा घेऊन फॉर्म भरू शकता. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुमचे जनधन खाते सुरक्षित राहील आणि तुम्हाला सर्व सरकारी योजनांचा फायदा मिळेल

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jan Dhan account : महत्त्वाची बातमी! जनधन खातेधारकांनो 30 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा खाते होईल बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल