संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीची आठवण येणारा किती खालच्या पातळीवरचा असू शकतो. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डोळे उघडावे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, यावर धनंजय देशमुखांनी देखील प्रतिक्रिया दिली. खरं कधी लपत नाही आणि खोटं कधी झाकता येत नाही. खून, खंडणी, गुन्हेगारी जिल्ह्यात कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा या गोष्टी सुरु करण्यासाठी उणीव भासत असावी अशी टीका धनंजय देशमुख यांनी केली. यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
advertisement
धनंजय मुंडे नक्की काय म्हणाले?
राजकीय स्वार्थापोटी परळीची राज्यात बदनामी केली गेली. आज ९ महिने झाले कार्यालय सुरू आहे. मात्र आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव होते, असे वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत महायुतीच्या प्रचार सभेत केले. त्यांनी वाल्मीक कराडची आठवण काढल्याची चर्चा आहे.
परळीत मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, आज एक माणूस आपल्यात नाही याची जाणीव मला आहे. कार्यकर्त्यांना सहकारी मानून मी काम करतो असे त्यांनी सांगितले. धनंजय मुंडेंचा रोख संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कारागृहात असलेला आरोपी वाल्मीक कराडच्या दिशेनेच होता, असं बोललं जातंय.
