पनवेलच्या पळस्पे फाट्यापासून खारपाडा हा या यात्रेचा पहिला टप्पा आहे. मनसेचे सर्व नेते आज रस्त्यावर उतरत आहेत. मनसे मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून आता आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राज्यभरातील मनसे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मनसेच्या जागर यात्रेचा वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आहे. याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
advertisement
शरद पवारांनंतर आता अजितदादांची तोफ धडाडणार; बीडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन
'17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल, तर ह्या खराब रस्त्यामुळे अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय म्हणायचं? मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे. आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय. पण तरीही काही सुधारणा होणार नसेल तर पुढचं आंदोलन अधिक तीव्र, आक्रमक करू. महाराष्ट्र सैनिक आणि कोकणी माणूस तुम्हाला अनुभवायला मिळेल', असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे.
