याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौरी व गणपतींच्या दीड, पाच आणि सात दिवसांच्या विसर्जनावेळी उल्हास नदीकाठी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य नदीत टाकले जाते. गणेशोत्सवानंतर नदीत सोडल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे उल्हास नदीच्या प्रदुषणात वाढ होते. हे टाळण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शेकडो सदस्यांनी विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन आणि त्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम राबवला गेला.
advertisement
Success Story: गायीच्या शेणापासून अनोखा व्यवसाय, सावंत दाम्पत्यानं वर्षाला 50 लाख कमावले!
प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकलित केलेलं निर्माल्य वेगळं करून त्यातील फुलांचा वापर करून कंपोस्ट खत तयार केलं जाणार आहे. हे खत प्रतिष्ठानने शहरात केलेल्या वृक्षारोपणासाठी वापरलं जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातील वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये उल्हास नदीचं प्रदुषण मोठ्या प्रमाणात वर्षात वाढलं आहे. नागरी सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतींतील सांडपाणी उल्हास नदीत सोडलं जातं. त्यामुळे उल्हास नदीत दरवर्षी जलपर्णी जमा होतात आणि या जलपर्णींमुळे पाण्याची पातळी खालावते. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत आहे. विसर्जन घाटांवर कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांनी शेकडो भाविकांना निर्माल्य नदीत न टाकता कलशात टाकण्यास प्रवृत्त केलं, याबाबत भाविकांनीही समाधान व्यक्त केलं.