नेमकं प्रकरण काय?
अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन तरुणी महाविद्यालय तृतीय वर्षात शिकतात. 21 जुलै रोजी कॉलेज संपल्यानंतर दुपारी तीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत दुचाकीवरुन तामसा रोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली. अल्पवयीन भाई आपल्या दोन मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहचला. त्याने बहिणीला आणि सत्ताजी भरकड याला एका खोलीत रंगेहाथ पकडले. दोघांमध्ये वाद झाला. घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरुन उडी मारून पळ काढला. यात तिचा एक हात मोडला.
advertisement
अल्पवयीन पोराने बहिणीच्या मित्राला भोसकले
दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी सत्ताजी मरकड याला लॉजमधून बाहेर खेचून आणले. भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण करुन पोटात खंजर भोसकले. यात सत्ताजी मरकड गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकमेकांविरोधात तक्रारी, पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू
दरम्यान 21 जुलै रोजी कॉलेज संपल्यानंतर सत्ताजी मरकड , नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांनी तिघींना दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि सत्ताजी मरकड याने अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सत्ताजी मरकडसह तिघांवर अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे सत्ताजी मरकड याच्या तक्रारीवरुन अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.