..तर महिला सुखी होतील : अंधारे
लाडकी बहीण योजनेवरुन बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, की पंधराशे रुपयांची महिलांना गरज का पडते? मालक धडधाकट कमवतो, पण येताना पावशेर मारतो. आकडे खेळतो, अशा धंद्यातच त्याची सर्व कमाई जाते. जर एवढी काळजी असेल तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना या बहिणींचं कल्याण करण्यासाठी दारूचे धंदे बंद करावे असं आव्हान सुषमा अंधारे यांनी दिलं. दारूचे धंदे बंद झाले तर मायमावल्या पंधराशे मागणार नाही, महिला सुखी होतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
advertisement
वाचा - शिंदे गटाचे मिलिंद मोरे यांचा मारहाण झाल्याने मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
अजित पवारांनी सख्ख्या बहिणींची काळजी घेतली नाही, आपली कोण घेतो : सुषमा अंधारे
लाडकी बहीण योजना अजित पवारांनी जाहीर केली. ज्या माणसाने एक महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला काय अर्थ आहे? असा सवाल करुन सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. आणि एवढी बहिणींची काळजी असेल तर बहिणीला पंधराशे नको दाजीला नोकरी द्या, दाजीच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या असं सुषमा अंधारे म्हणाल्या.