अजित पवार यांनी म्हटलं की, निवृत्तीचे संकेत दिलेत, मी याची मोठी किंमत चुकवली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं मला व्हिलन ठरवलं होतं. अशा प्रकारचा प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेला होता. ते सगळं जाहीर केल्यानंतर दोन ते तीन दिवसातच त्यांनी तो निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर असं ते म्हणाले होते.
उद्याला शरद पवार यांच्या मनात नक्की काय आहे हे महाराष्ट्रातल्या कोणालाही आजपर्यंत कळलं नाही. अगदी मी घरातला असलो तरीही घरातल्या व्यक्तीलासुद्धा कळलेलं नाही असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.
advertisement
काय म्हणाले शरद पवार?
मी १४ निवडणुका लढलो आणि त्यात विजयी झालो. अजून दीड वर्षे मी राज्यसभेचा खासदार असणार आहे. मुदत संपली की पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल. मी लोकसभा लढणार नाही. आता किती निवडणुका लढवायच्या. त्यामुळे आता थांबले पाहिजे असं शरद पवार मंगळवारी बारामतीत बोलताना म्हणाले.
दीड वर्षांपूर्वी घोषणेनंतर राजकीय उलथापालथ
दीड वर्षापूर्वी शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनावेळी निवृत्तीची घोषणा केली होती. पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं ते म्हणाले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली होती. तेव्हा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा निर्णय योग्य असल्याची भूमिका घेतली होती. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले.
