TRENDING:

Samruddhi Mahamarg: ठाणे ते समृद्धी महामार्ग गाठण्यासाठी आता लागणार फक्त काही मिनिटे, पण मोजावे लागणार इतके पैसे...

Last Updated:

Samruddhi Mahamarg Toll: ठाणे (साकेत) ते आमणे दरम्यान उभारल्या जाणाऱ्या नव्या ६,७४२ कोटींच्या उन्नत मार्गामुळे समृद्धी महामार्गाचा प्रवास आता सिग्नलमुक्त होणार आहे. मात्र, MMRDA ने या मार्गावर टोलचा प्रस्ताव मांडला आहे. जाणून घ्या कसा असेल हा नवा मार्ग आणि प्रवाशांना किती टोल मोजावा लागेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून ठाणे-मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सिग्नलमुक्त होणार असला, तरी त्यासाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठाणे (साकेत) ते आमणे या नव्या उन्नत मार्गावर १०० रुपये टोल आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. विशेष म्हणजे, या शुल्कात दरवर्षी ५ टक्के वाढही सुचवण्यात आली आहे.
: ठाणे ते समृद्धी महामार्ग गाठण्यासाठी आता लागणार फक्त काही मिनिटे, पण मोजावे लागणार इतके पैसे...
: ठाणे ते समृद्धी महामार्ग गाठण्यासाठी आता लागणार फक्त काही मिनिटे, पण मोजावे लागणार इतके पैसे...
advertisement

>> प्रकल्पाचे स्वरूप आणि खर्च

वाढते शहरीकरण आणि भिवंडी परिसरातील गोदामांमुळे होणारी अवजड वाहतूक लक्षात घेता, मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ६,७४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या सहा पदरी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.

>> कसा असणार उन्नत मार्ग

हा मार्ग ठाण्यातील आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाला जोडला जाईल. राजनौली जंक्शनपर्यंत हा मार्ग उन्नत (Elevated) असेल. पुढे सोनाळे गावापासून उजवीकडे वळण घेऊन हा मार्ग करवली आणि आमणे गावाजवळ समृद्धी महामार्गाला जोडला जाईल.

advertisement

>> टोल आकारणी का?

'लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकल्पाचा वाढता खर्च, जमिनीचे संपादन आणि बांधकामाची किंमत भरून काढण्यासाठी टोलचा पर्याय निवडण्यात आला आहे. सध्या समृद्धी महामार्गावरून आमणेपर्यंत येताना प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही कटकट दूर करण्यासाठी एमएमआरडीएने हा 'कनेक्टर' प्रस्तावित केला आहे.

>> का घेतला निर्णय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात
सर्व पहा

ठाणे, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली या शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आमणे ते ठाणे या ३० किलोमीटरच्या टप्प्यात वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक पोलिसांच्या नियोजनानंतरही ही कोंडी सुटत नसल्याने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाच्या आराखड्यात सुधारणा करून साकेत-आमणे या थेट मार्गाला हिरवा कंदील दाखवला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Samruddhi Mahamarg: ठाणे ते समृद्धी महामार्ग गाठण्यासाठी आता लागणार फक्त काही मिनिटे, पण मोजावे लागणार इतके पैसे...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल