शेतकरी आंदोलनानंतर आराखड्यात बदल
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील बागायती शेती बाधित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला होता. या आंदोलनाची दखल घेत शासनाने महामार्गाच्या मूळ आराखड्यात बदल केले. या बदलांमुळे आता सातारा जिल्ह्यालाही या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. सुधारित आराखड्यामुळे दुर्लक्षित आणि महामार्गापासून दूर असलेली अनेक गावे आता मुख्य प्रवाहात येणार आहेत.
advertisement
कोणत्या जिल्ह्यांना किती लाभ?
या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 73 गावे, सांगलीतील 25 गावे, सातारा जिल्ह्यातील 16 गावे आणि सोलापूर जिल्ह्यातील 35 गावे थेट जोडली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गावे कोणती?
हातकणंगले तालुका - जुने पारगाव, नवे पारगाव.
पन्हाळा तालुका - वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे.
करवीर तालुका - केर्ली केलें (रत्नागिरी नागपूर हायवे क्रॉस), पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला.
राधानगरी तालुका - राशिवडे बु., चंदे, येळवडे, कोलवडे, वाघावडे, मोहाडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे. कागल तालुका : बोरवडे, उंदरवाडी.
भुदरगड तालुका - नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली
आजरा तालुका - हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, मसोली, देऊळवाडी. चंदगड तालुका : बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर
विकासाला मिळणार नवी दिशा
शक्तिपीठ महामार्गामुळे राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योग, पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायांना गती मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच, या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतुकीत सुलभता येणार आहे.
महामार्गामुळे वाढणार आर्थिक संधी
या प्रकल्पामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बाजारपेठा, शेती उत्पादनांची वाहतूक आणि औद्योगिक विकास यांना गती मिळेल. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नसून विकासाचा नवा महामार्ग ठरणार असल्याचे मानले जात आहे.
