राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर स्वत:ला सावरत आहे. डीपीडीसीच्या बैठका आणि बारामतीतला जनता दरबार...सुनेत्राताईंनीही दादांसारखा कामाचा धडाका सुरू केला आहे . आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषण देखील केले आहे. पहिल्यांदाच त्यांनी भाषण केले यावेळी त्या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. सुनेत्रा पवार यांचे पहिले भाषण केले असून ते व्हायरल झाले आहे. या कार्यक्रमाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
advertisement
दादांसाठी मी सगळं बाजूला ठेवून... सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
सुनेत्रा पवार म्हणाल्या, दादांचं कामावर असलेलं निस्सीम प्रेम आणि चिकाटीच आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचं सांगत त्या पुढे म्हणाले, दादांना काम आणि काम हेच ध्येय होते. दादांचं कामावरील प्रेम सर्वांना माहीत आहे, म्हणूनच दादांना आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. दादांना आवडणाऱ्या गोष्टी, लोकहिताची कामं आणि विकासाची गती कायम ठेवणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. म्हणूनच मी सगळं बाजूला ठेवून ही जबाबदारी स्वीकारली आहे.
दादांच्या जाण्याने पोरके झालो :सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना प्रोत्साहन आणि नवीन ऊर्जा देण्यासाठी भाषण करताना त्या भावूक झाल्या. दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. तुम्ही दादांचे स्वप्न तुम्ही पूर्ण कराल याची खात्री आहे असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
हे ही वाचा :
