शरद पवारांसाठी ठाकरेंची बॅटींग
अगोदर येथे जमलेल्या पक्षांमध्ये विरोध झाले. तरीपण ते विसरून आम्ही आज एका व्यासपीठावर आलो. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची दोस्ती अजरामर आहे. सध्या सोबत्याला पण संपवायची पद्धत आली आहे. मोदी महाराष्ट्रात आले होते, त्यांनी पवारांवर टीका केली. पवारसाहेब कृषी मंत्री असताना 70 हजार कोटींची कामे शेतकऱ्यांसाठी केली आहेत. सध्या गंगा पृथ्वीवर मीच आणली अशा अविर्भावात लोकं वावरतात. अनेकांनी सांगितली ही इंडियाची मीटिंग आहे. पण ही इंडियाची मीटिंग एवढ्याशा मंडपात होणार नाही. जी मिटींग होईल ती पूर्ण भारतभर होणार आहे. तुम्ही जो सध्या डाव मांडलेला आहे. तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.
advertisement
मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शेकाप काहीसा बॅकफूटला गेलेल्या अवस्थेत होता. राज्यात मागील दोन वर्षांत ज्या राजकीय घडामोडी सुरू होत्या त्याबाबतही शेकापचे आमदार जयंत पाटील बुचकळयात पडलेल्या अवस्थेत होते. शेकापनेते सावध पवित्रा घेत होते. काय भूमिका घ्यायची याबाबत शेकापमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र २ ऑगस्ट रोजी पाली येथे झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शेकापने आपली भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडी बरोबर राहणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तटकरेंच्या बालेकिल्ल्यात आणण्याचा घाट आमदार जयंत पाटलांनी घातला आहे.
वाचा - 'तेव्हा तर म्हटले होते शरद पवार गुरू...'; दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया आघाडीचे कोकणात प्रथमच शक्तीप्रदर्शन होणार आहे. शेकापसह शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्रितरित्या आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणूकीतील शेकापच्या पराभवापासून जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यातून विस्तव जात नाही, अशी परीस्थिती आहे. परंतु जयंत पाटील हे तटकरे यांच्यावर थेट टीका करणे टाळत होते मात्र त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. आगामी काळात जयंत पाटील हे तटकरे यांच्या विरोधात थेट मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
