उन्हाच्या चटक्यात पावसाची एन्ट्री?
सध्या महाराष्ट्राच्या डोक्यावर दोन टोकाची हवामान संकटं घोंघावत आहेत. एकीकडे ठाणे, मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या ५ जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा अलर्ट आहे, तर दुसरीकडे याच उष्णतेमुळे बाष्प तयार होऊन अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. अरबी समुद्राकडून येणारे वारे आता वेगाने ओलावा घेऊन उत्तर महाराष्ट्राकडे सरकत आहेत.
advertisement
स्कायमेटने वर्तवला अंदाज
स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहील. यामुळे उकाडा प्रचंड वाढणार असला, तरी काही ठिकाणी अचानक सरप्राईज पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात उष्णता असली, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार शक्यता आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?
१४ मार्चनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारे आणि गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे १४ आणि 15 मार्च रोजी शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना IMD ने दिल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र इथे दमट आणि उष्ण हवामानामुळे उकाडा जास्त जाणवण्याची शक्यता आहे. तर पाऊस होऊन गेल्यानंतर पुन्हा उकाडा जास्त वाढण्याची भीती आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
