वाघ नगरातील राहुल सोनार हा विसर्जनासाठी गिरणा नदीत उतरला. गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदीचा प्रवाह जोरात होता. त्यावेळी राहुलला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहत गेला. राहुलसोबत असलेल्या मित्राला वाचविण्यात सुदैवाने यश आले आहे. घटनेच्या ५० तासांनंतरही मृतदेह सापडलेला नसून शोधकार्य सुरू आहे !
घटना कशी घडली?
advertisement
जळगाव शहरात आर्यन पार्क येथील गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडली. वाघ नगर येथे राहणारा राहुल रतिलाल सोनार हा तरुण आपल्या मित्रासोबत विसर्जनासाठी नदीत उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात वाहून गेला. राहुलसोबत असलेल्या विश्वनाथ पाटील याला एका नागरिकाच्या मदतीने वाचवण्यात यश आले, मात्र राहुलचा शोध लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असून, घटनेला २६ तास उलटूनही त्याचा काही थांगपत्ता लागलेला नाही. गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडलेले असल्यामुळे गिरणा नदीचा प्रवाह वेगवान असल्यामुळे गिरणा नदीच्या काठावरील गावांमध्ये देखील राहुलचा शोध घेतला जात आहे. दरम्यान गिरणा नदीतच गणेश कोळी हा तरुण देखील गणपती विसर्जना वेळी वाहून गेलेला आहे. त्याचा देखील अद्याप शोध लागलेला नाही.