आकाशच्या आजोबांनी 40 वर्षांपूर्वी 50 पैसे-1 रुपयांमध्ये उसाचा रस विकून या व्यवसायाची सुरुवात केली होती. पुढे वडिलांनी ती चालवली आणि आता आकाश या व्यवसायाची तिसरी पिढी म्हणून चालवत आहे. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या या गुऱ्हाळात आता आधुनिकतेचा स्पर्श आहे. केवळ उसाचा रसच नाही, तर लिंबू पाणी, कोकम सोडा यांसारखी इतर पेयेही येथे उपलब्ध आहेत.
advertisement
शेवग्याच्या पानातून समृद्धी! सादिकानं बदलली गावाची आणि स्वतःची लाईफ, महिना कमवते 1 लाख
आज 250 मिली रसाचा एक ग्लास 20 रुपयांना विकला जातो आणि दिवसाला सुमारे 500 ग्लास विक्री होते. त्यातून दिवसाला जवळपास 10 हजार रुपयांची उलाढाल होते. या व्यवसायात आकाशला त्याचे आई-वडील पूर्ण मदत करतात.
आकाश चव्हाण यांची ही प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढीला दाखवते की, उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावण्याऐवजी पारंपरिक व्यवसायात नवकल्पनांच्या आधारे मोठे यश मिळवता येते. ग्रामीण उद्योगात संधी कशा निर्माण करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.